Chanakya Niti: माणसाने 'या' बाबतीत कधीच लाजू नये, काय सांगते चाणक्य नीती एकदा वाचाच
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: माणसाने 'या' बाबतीत कधीच लाजू नये, काय सांगते चाणक्य नीती एकदा वाचाच

Chanakya Niti: माणसाने 'या' बाबतीत कधीच लाजू नये, काय सांगते चाणक्य नीती एकदा वाचाच

Published Sep 04, 2024 08:09 AM IST

Thoughts of Acharya Chanakya: माणसाने आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी कसे वागावे आणि कसे वागू नये याबाबत सर्व उपदेश चाणक्य नीतीमध्ये देण्यात आले आहेत.

Chanakya Niti:  चाणक्य नीती
Chanakya Niti: चाणक्य नीती

Chanakya Niti In Marathi:  आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. ते एक महान ज्ञानी आणि विद्वान असल्याचे म्हटले जाते. आचार्य चाणक्यांनी एक धोरणात्मक ग्रंथ रचला आहे ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात. चाणक्य नीती तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही साध्य करण्यात मदत करते. जर तुम्ही चाणक्य नीती पूर्णपणे वाचली आणि त्याचे पालन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही कधीही रोखू शकत नाही.

आचार्य चाणक्याने या धोरणांमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये नमूद केलेल्या अशा काही परिस्थितींबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये व्यक्तने कधीही लाजू नये. जर तुम्हाला या ठिकाणी लाज वाटत असेल तर तुम्ही नेहमीच मागे राहता आणि कधीकधी लाजाळूपणामुळे तुम्हाला अपयशही मिळू शकते. त्यामुळे चाणक्य नीतीमध्ये या परिस्थितीमध्ये न लाजण्याचा सल्ला दिला आहे.

शिक्षणाच्या बाबतीत-

बऱ्याच वेळा आपल्याला नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असते. परंतु आपण संकोच करतो किंवा लाजतो कारण आपल्याला शिकवणारी व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असते. चाणक्य नीतीनुसार व्यक्तीने हे कधीही करू नये. शिक्षण मिळेल तेथून घेतले पाहिजे. जर तुम्हाला लाजाळूपणामुळे शिक्षण मिळाले नाही तर तुम्ही आयुष्यात नेहमीच मागे राहता. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत कधीही लाजू नका.

पैशाच्या बाबतीत-

चाणक्य नीतीनुसार, माणसाला पैशाच्या बाबतीत कधीही लाज वाटू नये. अनेक वेळा असे घडते की, आपल्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी आपल्याकडून पैसे घेतले आहेत, परंतु आपण त्यांना परत मागण्यास संकोच करतो किंवा लाजतो. तुम्हीही असे करत असाल तर तुम्ही तसे करणे थांबवावे. आर्थिक बाबतीत नेहमीच व्यवहाराने वागावे तरच तुमची प्रगती होईल.

सर्वांसमोर आपले मत मांडणे-

जर तुम्हालाही योग्य आणि अयोग्य यातील फरक माहित असेल, परंतु तरीही इतरांसमोर तुमचे मत व्यक्त करण्यात किंवा बोलण्यास लाज वाटत असेल तर तुम्ही असे कधीही करू नये. तुमच्या मनातील भावना सर्वांसमोर उघडपणे व्यक्त कराव्यात. तुमची मते इतरांसमोर मांडण्यात तुम्ही कधीही संकोच करू नये किंवा घाबरू नये. चाणक्य नीतीनुसार, असे लोक आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत ते नेहमी मागे राहतात. त्यामुळे योग्य अयोग्य गोष्टींच्या बाबतीत ठामपणे आपले मत मांडा.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner