Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मते 'या' गोष्टींना चुकूनही लावू नये पाय, आयुष्य होऊ शकते उध्वस्त
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मते 'या' गोष्टींना चुकूनही लावू नये पाय, आयुष्य होऊ शकते उध्वस्त

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या मते 'या' गोष्टींना चुकूनही लावू नये पाय, आयुष्य होऊ शकते उध्वस्त

Published Sep 24, 2024 08:10 AM IST

Thoughts of Acharya Chanakya: कोणतीही व्यक्ती त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे अनुसरण करते किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते तेव्हा त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Chanakya niti
Chanakya niti

Chanakya Niti In Marathi:  आचार्य चाणक्य हे त्यांच्या काळातील अत्यंत ज्ञानी आणि विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी त्यांच्या हयातीत अनेक वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. असे म्हटले जाते की, कोणतीही व्यक्ती त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे अनुसरण करते किंवा त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालते तेव्हा त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अनेक धोरणे रचली आहेत. आज या लेखात आम्ही तुम्हाला चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या त्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याला तुम्ही चुकूनही पाय लावू नये. यापैकी कोणत्याही गोष्टीवर तुम्ही पाय लावल्यास तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. चला तर मग या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

त्याआधी आपण आचार्य चाणक्य यांच्याबाबत थोडेसे जाणून घेऊया. आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु होते. ते एक महान ज्ञानी आणि विद्वान असल्याचे म्हटले जाते. आचार्य चाणक्यांनी एक धोरणात्मक ग्रंथ रचला आहे ज्याला 'चाणक्य नीती' म्हणतात. चाणक्य नीती तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही साध्य करण्यात मदत करते. जर तुम्ही चाणक्य नीती पूर्णपणे वाचली आणि त्याचे पालन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कुणीही कधीही रोखू शकत नाही.

'चाणक्य नीती'नुसार 'या' गोष्टींना चुकूनही पाय लावू नये-

आग-

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने कधीही अग्नी किंवा आगीला पायांनी स्पर्श करू नये. जर तुम्ही तुमच्या पायाने अग्नीला स्पर्श केला तर तुमचा पाय जळू शकतो. शास्त्रातही अग्नीला देवता म्हणून वर्णन केले असून अग्नीला पायाने स्पर्श केल्यास तो देवांचा अपमान आहे. त्यामुळे अग्नीला चुकूनही पाय लावू नये.

गाय-

चाणक्य नीतीनुसार, गायीला कधीही पाय लावू नये. असे करणे हे महापापाच्या श्रेणीत येते. अनेक वेदांमध्ये असेही म्हटले आहे की, जो माणूस गायीवर पाऊल ठेवतो किंवा लाथ मारतो तो पूर्णपणे नाश पावतो. त्यामुळे शास्त्रानुसार गायीला माता मानले जाते. म्हणूनच गायीला पाय लावल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.

मुली आणि बाळ-

चाणक्य नीतिनुसार, व्यक्तीने कधीही मुलीला किंवा लहान बाळाला पायाने स्पर्श करू नये. यापैकी कोणावरही पाऊल टाकले तर पाप लागेल. त्यामुळे मुलींना किंवा लहान बालकांना पायाने स्पर्श करणाऱ्या व्यक्तींचा नाश होतो.

वृद्ध, ब्राह्मण आणि गुरु-

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने ब्राह्मण, वृद्ध, किंवा गुरु यांना कधीही पायाने स्पर्श करू नये. हे सर्व लोक अतिशय आदरणीय आहेत आणि त्यांना नेहमीच समान वागणूक दिली पाहिजे. जर तुम्ही या लोकांना पायाने स्पर्श केला तर तुम्हाला आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल.

Whats_app_banner