Chanakya Niti In Marathi: दु:ख वाटून कमी होते आणि सुख वाटून वाढते. ही म्हण तुम्ही खूप ऐकली असेल. पण आचार्य चाणक्यांनी याच्या उलट काहीतरी सांगितले आहे. आपल्या आयुष्यातील दु:ख, वेदना आणि संकटे कधीच काही लोकांसोबत शेअर करू नयेत, असे त्यांनी म्हटले आहे. या लोकांपासून अंतर राखणे खूप महत्वाचे आहे, कारण या लोकांशी शेअर केलेल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतात. अशा परिस्थितीत हे लोक कोण आहेत हे जाणून घेऊया.
सर्वांशी मैत्रीपूर्ण वागणारी व्यक्ती. जर कोणी योग्य किंवा चुकीच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करत असेल तर अशा व्यक्तीसोबत तुम्ही तुमचे दु:ख आणि वेदना कधीही शेअर करू नका. अशी व्यक्ती कधीही तुमचा विश्वास तोडू शकते. जो सर्वांचा आहे तो कोणाचाच नसतो असेही म्हणतात.
बऱ्याचदा आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांना फक्त स्वतःच्या हिताची काळजी असते. इतर चांगले आहेत की वाईट याचा त्यांना काही फरक पडत नाही. आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की अशा लोकांना तुमचे दुःख सांगणे टाळा, कारण ते स्वतःचा स्वार्थ काढण्यासाठी तुम्हाला कधीही फसवू शकतात.
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, ज्या व्यक्तीला इतरांचे यश आणि उपलब्धी पाहून मत्सर होतो. त्यांना आपल्या समस्या सांगू नयेत. असे लोक तुम्हाला नक्कीच सांत्वन देतील. पण मनात खूप आनंदी होतील.
प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवणाऱ्या आणि इतरांचे बोलणे गांभीर्याने न घेणाऱ्या लोकांसोबत कधीही आपल्या समस्या आणि दु:ख शेअर करू नये. असे लोक तुमच्या समस्या इतरांना फक्त विनोदाने सांगू शकतात.
माणसाने विचारपूर्वक बोलावे असे म्हणतात. पण काही लोक असे असतात जे खूप बोलके असतात. ते विचार न करता कुठेही काहीही बोलतात. आचार्य चाणक्य यांनी या लोकांपासून अंतर राखण्याचे सांगितले आहे. तुम्ही तुमच्या समस्या या लोकांना कधीही सांगू नका.
संबंधित बातम्या