असं काय घडलं की स्वतःच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत रमेश भाटकर यांचं नाव टाकलं गेलं नाही? वाचा किस्सा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  असं काय घडलं की स्वतःच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत रमेश भाटकर यांचं नाव टाकलं गेलं नाही? वाचा किस्सा

असं काय घडलं की स्वतःच्या मुलाच्या लग्नपत्रिकेत रमेश भाटकर यांचं नाव टाकलं गेलं नाही? वाचा किस्सा

Jan 07, 2025 03:34 PM IST

Ramesh Bhatkar : रमेश भाटकर यांच्या कुटुंबाच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. इतकंच काय तर, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर बापाचं नाव देखील लावण्यात आलं नाही.

Ramesh Bhatkar
Ramesh Bhatkar

Actor Ramesh Bhatkar : रमेश भाटकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक अत्यंत प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता होते. त्यांच्या अभिनयाची खास शैली आणि विविध भूमिकांमुळे ते प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाले. ‘माहेरची माणसे’, ‘दुनिया करी सलाम’, ‘अष्टविनायक’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’ आणि इतर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या, ज्या खूप गाजल्या. त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडली होती. पण, त्यांच्या करकीर्दीदरम्यान त्यांच्यावर एक गंभीर आरोप झाला होता, ज्यामुळे त्यांच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. इतकंच काय तर, त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर बापाचं नाव देखील लावण्यात आलं नाही.

रमेश भाटकर यांच्यावर १७ वर्षांच्या एका अभिनेत्रीकडून बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला होता. ही बातमी ऐकून सिनेइंडस्ट्रीतील अनेक जणांना आणि चाहत्यांना शॉक बसला. या आरोपामुळे रमेश भाटकर यांची प्रतिष्ठा धोक्यात आली होती. तथापि, रमेश आणि त्यांच्या पत्नी मृदुला भाटकर यांनी या संकट काळातही अत्यंत शांतपणे परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर मात केली.

सावळी म्हणून अनेकांनी हिणवलं, बॉलिवूड गाजवून बिपाशा बसूनं सगळ्यांनाच गप्प केलं!

नेमकं काय झालेलं?

नुकतीच मृदुला भाटकर यांनी एक मुलाखत दिली आहे, ज्यात त्यांनी या कठीण काळात घडलेल्या घटनांबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, रमेश यांच्यावर आरोप असताना, न्यायालयाने त्यांना सोडलं होतं, पण सरकारने रिव्हिजन टाकलं होतं. त्यावेळी मृदुला भाटकर यांना या निर्णयाबद्दल पूर्ण माहिती नव्हती, मात्र तेव्हा सरकारने रिव्हिजन टाकण्याचे त्यांचे कायदेशीर अधिकार होते. याविरोधात लढा देणे त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे होते, रमेश यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आले नव्हते. सरकार विरुद्ध असलेली ही केस पूर्णपणे वेगळी होती.

लेकाच्या लग्न पत्रिकेवर बापाचं नाव नाही!

त्याच वेळी, त्यांचा मुलगा हर्षवर्धन आणि सुप्रिया यांचे लग्न देखील होते. यावेळी लग्नाच्या आमंत्रण पत्रिका कशा छापाव्या यावर एक प्रश्न उपस्थित झाला होता, कारण पत्रिकेवर रमेश आणि मृदुला यांचे नाव कसे ठेवायचे हे महत्त्वाचे होते. त्यावेळी हर्षवर्धन आणि सुप्रिया यांनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी स्वत:च्याच नावाला निमंत्रक ठेवून लग्नाच्या आमंत्रण पत्रिका छापल्या. या केसमुळे सगळ्याच परिस्थितीला वेगळं वळण मिळालं होतं. या सर्व घटनांनंतर, मृदुला भाटकर आणि रमेश भाटकर यांनी कायमच संकटकाळात संयम आणि विवेक दाखवला. रमेश भाटकर यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले, पण त्यांच्या कुटुंबाने सगळ्या परिस्थिती समर्थपणे हाताळल्या. या घटनांमुळे त्यांचे सामाजिक आणि कुटुंबीय संबंध आणखी प्रगल्भ झाले. ४ फेब्रुवारी २०१९ रोजी रमेश भाटकर यांनी या जगाचा निरोप घेतला.

Whats_app_banner