Bollywood Movies On Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षासाठी त्यांचा सातवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. या दरम्यान सगळ्या देशवासीयांच्या नजरा बजेटकडे लागल्या आहेत. देशाचं बजेट बघत असतानाच सामान्य माणूस आपले खिसे देखील तपासात असतो. यावेळी आपल्या खिशावर किती वजन पडणार, याचा विचार सगळेच करत असतात. बॉलिवूडच्या काही चित्रपटांनीही सामान्य माणसाची हीच स्थिती आपल्या चित्रपटांमधून दाखवली आहे. याशिवाय पैसा कसा जपून वापरावा याची शिकवण देखील दिली आहे. चला एक नजर टाकूया या चित्रपटांवर...
१९७७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घरौंदा’ या चित्रपटात अमोल पालेकर आणि झरिना वहाब यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील सुधीर आणि छाया ही जोडी खूप मेहनत करून, थोडे थोडे पैसे साठवून आपलं स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, ते ज्या बिल्डरकडे हे सगळे पैसे जमा करतात, तो बिल्डर फ्रॉड निघतो आणि सगळ्यांना धोका देऊन पळून जातो. त्यामुळे त्यांचं घराचं स्वप्न अर्धवटच राहतं. शिवाय, पैसा अडकून पडल्यामुळे त्यांना मोठा धक्का देखील बसतो. या चित्रपटातून असं दाखवलं गेलं आहे की, रियल इस्टेट मार्केटमध्ये पैसा गुंतवताना बिल्डरचा आणि डेव्हलपरचा पूर्व इतिहास नक्की तपासला पाहिजे.
१९८३ मध्ये राजेश खन्ना आणि शबाना आजमी यांचा ‘अवतार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अवतार किशन आणि त्यांची पत्नी त्यांच्या तीन मुलांचे संगोपन करण्यासाठी भरपूर मेहनत करत असतात. या सुखी कुटुंबात एक दुःखद घटना घडते. एकदा अवतारचा अपघात होतो आणि त्याला वेळेआधीच रिटायर व्हावे लागते. त्याने जमवलेला सगळा पैसा मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या लग्नावर खर्च केलेला असतो. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा ते पूर्णपणे त्यांच्या मुलांवर अवलंबून असतात. मात्र, त्यावेळेस मुलं त्यांना घराबाहेर काढून, त्यांची आयुष्यभराची सगळी कमाई स्वतःकडे ठेवून घेतात. या चित्रपटातून असे सांगण्यात आले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती वृद्धत्वाकडे झुकत असते, त्यावेळेस त्या व्यक्तीने आपला सगळा पैसा गुंतवणुकीत न टाकता, स्वतःच्या भविष्याचा विचार करून स्वतःकडे देखील राखून ठेवला पाहिजे.
‘रोटी, कपडा और मकान’ हा चित्रपट १९७४मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मनोज कुमार यांची मुख्य भूमिका होती. ते स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शकही होते. घरच्या प्रमुखाच्या आकस्मिक निधनानंतर एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी यात दाखवण्यात आली होती. जेव्हा घरात अशी एखादी स्थिती उद्भवते तेव्हा साठवलेला पैसा कसा उपयोगी पडू शकतो, याचे महत्त्व यात अधोरेखित करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या