Tharala Tar Mag: सायली आणि अर्जुनला बसणार आणखी एका मोठा धक्का! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायली आणि अर्जुनला बसणार आणखी एका मोठा धक्का! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag: सायली आणि अर्जुनला बसणार आणखी एका मोठा धक्का! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Published Oct 08, 2024 01:43 PM IST

Tharala Tar Mag 8 October 2024 Serial Update: आश्रमासंबंधात एक मोठी बातमी त्यांच्या हाती येणार आहे. यामुळे सायली चक्कर येऊन पडणार आहे, तर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकणार आहे.

Tharala Tar Mag 8 October 2024
Tharala Tar Mag 8 October 2024

Tharala Tar Mag 8 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे प्रतिमा आत्या घरातून बाहेर गेल्या आहेत. तर, आश्रमासंबंधात एक मोठी बातमी त्यांच्या हाती येणार आहे. यामुळे सायली चक्कर येऊन पडणार आहे, तर अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. यामुळे सुभेदार कुटुंबासह सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात देखील मोठं वादळ येणार आहे. ज्या आश्रमाला वाचवण्यासाठी सायली आणि अर्जुन इतके दिवस प्रयत्न करत होते, त्यावरच आता संकट येणार आहे.

प्रियाच्या चालीमुळे आधीच प्रतिमा आत्या सायली आणि सुभेदार कुटुंबापासून दुरावल्या आहेत. यामुळे सायली खूप उदास झाली आहे. सायली प्रतिमा आत्यांची खूप मनापासून काळजी घेत होती. इतकंच नाही तर, तिने त्यांना आई मानलं होतं. यामुळे सायली आधीच निराश झाली आहे. यातून सावरत असतानाचा आता सायलीला एक पत्र मिळालं आहे. सायलीला मिळालेलं हे पत्र म्हणजे कोर्टाची नोटीस आहे. या नोटिशीमुळे सायली पूर्णपणे कोलमडून गेली आहे. या पत्रात आश्रम केस विषयी महत्त्वाची अपडेट आली आहे.

Tharala Tar Mag: इच्छा नसतानाही प्रतिमा आत्या घर सोडून जायला निघाल्या! ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

सायली चक्कर येऊन पडणार!

सायली घरात काम करत असताना तिला एक पत्र मिळणार आहे. हे पत्र वाचून सायलीला धक्का बसणार आहे. पत्र वाचताच सायली तिथेच चक्कर येऊन पडणार आहे. यावेळी सगळे तिला सोफ्यावर बसवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. सायलीला नेमकं काय झालं हे कुणालाच कळत नाही. तेव्हा, तिला रडताना पाहून सगळेच कारण विचारू लागतात. तेव्हा सायली त्या नोटीसकडे बोट दाखवते. ही नोटीस उघडून अर्जुन सगळ्यांना वाचून दाखवतो. त्यात लिहिलेली सूचना ऐकल्यावर आता सगळ्यांनाच धक्का बसणार आहे.

नेमकं झालं काय?

गेले कित्येक महिने अर्जुन आणि सायली ज्या आश्रमाला वाचवण्यासाठी लढत होते, त्या आश्रमावर आता हातोडा चालवला जाण्याची शक्यता आहे. महीपत शिखरे याने आश्रमाची जमीन हडपण्यासाठी तिथे एक खून घडवून आणला होता. तर, या खुनाचा आरोप त्याने मधुभाऊंवर लावला होता. मधुभाऊंना सोडवण्यासाठी आणि आश्रम वाचवण्यासाठी सायली आणि अर्जुन लढत होते. मात्र, आता कोर्टाने दिलेली स्टे ऑर्डर रद्द झाल्याची नोटीस त्यांना मिळणार आहे. आता अर्जुन आणि सायली आपलं आश्रम वाचवू शकतील का, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner