Tharala Tar Mag : अर्जुनच्या प्लॅनमुळे दुखावलेली सायली घर सोडून जाणार? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag : अर्जुनच्या प्लॅनमुळे दुखावलेली सायली घर सोडून जाणार? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag : अर्जुनच्या प्लॅनमुळे दुखावलेली सायली घर सोडून जाणार? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Published Oct 29, 2024 01:48 PM IST

Tharala Tar Mag 29 October 2024 Serial Update:मधुभाऊ तुरुंगातून सुटले की, सायली त्यांच्याबरोबर कायमची आश्रमात निघून जाणार, असं अर्जुनला वाटत आहे.

Tharala Tar Mag 29 October
Tharala Tar Mag 29 October

Tharala Tar Mag 29 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. सध्या सायली अर्जुनवर चांगलीच चिडली आहे. चैतन्यच्या प्लॅनमुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र, दोघांमधील हे गैरसमज आता एक वेगळे वळण घेणार आहेत. या गैरसमजामुळे सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दूर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरं तर सायलीच्या प्रेमात पडलेला अर्जुन तिने दूर जाऊ नये, म्हणून काही करायला तयार आहे. यातच त्याने सायली आणि कुसुमताईच बोलणं अर्धवट ऐकल्याने त्याच्या मनातही एक वेगळाच गैरसमज निर्माण झाला. 

मधुभाऊ तुरुंगातून सुटले की, सायली त्यांच्याबरोबर कायमची आश्रमात निघून जाणार, असं अर्जुनला वाटत आहे. मात्र, सायलीच्या बोलण्यात आश्रमात कायमचे निघून जाण्याचा काहीही संदर्भ नसतो. ती कुसुमताईला सांगत असते की, अर्जुन सरांचं माझ्यावर प्रेम नसेल, तर मी मधुभाऊंसोबत आश्रमात जाईन. मात्र, अर्जुनने हे बोलणं अर्धवट ऐकल्याने तो आता मनातून खचून जाऊ लागला आहे. ज्या व्यक्तीवर आपलं भरपूर प्रेम आहे, ती आपल्यापासून दूर जाईल या भीतीने तो काही करण्यासाठी तयार झाला आहे. तर, अर्जुनला असं खचलेले पाहून चैतन्याच्या डोक्यात एक वेगळीच आयडी आली. तो अर्जुनला सांगतो की, ‘मधुभाऊंना आपण आणखी काही दिवस तुरुंगातच राहू देऊ. त्यांच्या केसला थोडसं लांबणीवर टाकू म्हणजे सायली वहिनी तुझ्या सोबतच राहील.’

Tharala Tar Mag : अर्जुन-चैतन्यचं बोलणं ऐकून सायलीचा मोठा गैरसमज होणार! मालिकेत आज काय घडणार?

गैरसमज आणखी वाढणार!

मात्र, कधी ना कधी सायली वहिनीला मधुभाऊंसोबत जावं लागेल, म्हणूनच आणखी काही दिवस सायली वहिनी इथे थांबावी यासाठी आपण मधुभाऊंची केस थोडी लांबणीवर टाकू शकतो, असे चैतन्य सुचवतो. मात्र, अर्जुन यासाठी अजिबात तयार होत नाही. तो चैतन्यला या गोष्टीसाठी नकार देत असतो. सायलीने इथे थांबावं म्हणून मधुभाऊंची केस लांबणीवर टाकायची हे चुकीचं आहे, असं अर्जुन चैतन्यला म्हणतो. मात्र, त्यावेळी तिथे आलेल्या सायलीने केवळ अर्जुन केस लांबणीवर टाकेल, तितकीच गोष्ट ऐकलेली असते. त्यामुळे आता तिच्याही मनात गैरसमज निर्माण होतो आणि ती प्रचंड चिडते.

सायली घर सोडून जाणार?

यानंतर आता सायली मधुभाऊंना भेटण्यासाठी तुरुंगात जाणार आहे. मात्र, अर्जुन मीही सोबत येतो असं तिला सांगणार आहे. यावर चिडलेली सायली त्याला, तुम्ही माझ्यासोबत यायची काहीही गरज नाही, असं म्हणत निघून जाणार आहे. तर आता अर्जुन घरी जाऊन सायलीला शोधणार आहे. मात्र, सायली घरातही नसणार आहे. आता सायली खरंच घर सोडून जाणार का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner