Tharala Tar Mag: सायली मागणार अर्जुनकडे मोठं वचन; पूर्ण होईल का दोघांचं ध्येय? ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायली मागणार अर्जुनकडे मोठं वचन; पूर्ण होईल का दोघांचं ध्येय? ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?

Tharala Tar Mag: सायली मागणार अर्जुनकडे मोठं वचन; पूर्ण होईल का दोघांचं ध्येय? ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?

Published Oct 11, 2024 12:01 PM IST

Tharala Tar Mag 11 October 2024 Serial Update: सायलीवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. आधी प्रतिमा आत्या तिच्यापासून दूर गेल्या आहेत. तर, दुसरीकडे सायलीच्या आश्रमावर आता हातोडा चालवला जाणार आहे.

Tharala Tar Mag 11 October 2024
Tharala Tar Mag 11 October 2024

Tharala Tar Mag 11 October 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता सायली आणि अर्जुन यांच्यावर एकापाठोपाठ एक संकटं कोसळताना दिसत आहेत. यामुळे आता सायलीचा धीर खचू लागला आहे. एक एक गोष्टी आता हातातून निसटून चालल्या, असे तिला वाटत आहे. यामुळेच आता ती देवीच्या मंदिरात धाव घेऊन, देवी आईलाच साकडं घालणार आहे. यावेळी ती अर्जुनकडून देखील एक वचन मागून घेणार आहे. देवी आईसमोर सायली अर्जुनकडे एक मागणी मागणार आहे. आता सायलीची ही मागणी अर्जुन पूर्ण करू शकेल का? हे लवकरच पाहायला मिळणार आहे.

सायलीवर संकटांचा डोंगर कोसळला आहे. आधी प्रतिमा आत्या तिच्यापासून दूर गेल्या आहेत. तर, दुसरीकडे सायलीच्या आश्रमावर आता हातोडा चालवला जाणार आहे. यामुळे ती मनाने पूर्णपणे खचून गेली आहे. प्रियाने अर्जुनला लग्नासाठी प्रपोज केला. मात्र, अर्जुनने प्रियाच्या या प्रपोजला थेट नकार दिला. इतकंच नाही तर, त्याने प्रियाला धक्का देत तिला आपलं सायलीवर प्रेम करत असल्याचे सांगितले. अर्जुनच्या तोंडून हे ऐकून प्रियाला मोठा धक्का तर बसलाच. पण तिचा संताप देखील झाला. यामुळेच प्रियाने बदला घेण्याचा निर्णय घेतला होता. यातूनच सगळ्या संकटांना सुरुवात झाली आहे.

Tharala Tar Mag: आधी प्रतिमा आत्या गेली, आता आश्रमही सायलीच्या हातून जाणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

प्रतिमा आत्या दुरावल्या!

सायली आणि अर्जुनकडून बदला घेण्यासाठी प्रतिमा आत्याचा वापर करण्याचा निर्णय घेते. यामुळेच तिने आपण आपल्या आईला घेऊन घरी जाणार असल्याचा निर्णय सगळ्यांना सांगते. तर, तिच्या स्मृती परतून येतील या विचाराने घरचे देखील तिला यासाठी होकार देतात. मात्र, यामागे प्रियाचा वेगळाच डाव आहे. प्रतिमाला सगळ्यांपासून लांब न्यायचं आणि तिला त्रास देऊन सगळ्यांना त्रास द्यायचा, हा प्रियाचा विचार होता. ती तिच्या या डावामध्ये सफल झाली आहे. यामुळे सायली आधीच खूप काळजीत पडली आहे. प्रतिमा आत्या दूर गेल्याने सायली एकटी पडली आहे.

अर्जुन वाचवू शकेल का आश्रम?

यातच आता सायलीला आश्रमाची नोटीस मिळाली आहे. या नोटीसमध्ये सायलीच्या आश्रमावर हातोडा चालणार असल्याचे म्हटले आहे. हे ऐकल्यानंतर सायली चक्कर येऊन पडली. तिच्यावर आता हे दुहेरी संकट ओढवले आहे. या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी आता सायली देवीच्या देवळात धाव घेणार आहे. तिच्यासोबत अर्जुन देखील मंदिरात जाणार आहे. यावेळी सायली देवीला साक्षी मानून अर्जुनकडे एक मागणी मागणार आहे. ‘अर्जुन सर मला वचन द्या की, तुम्ही आश्रमाला तुटण्यापासून वाचवाल’, असे सायली अर्जुनला म्हणणार आहे.

Whats_app_banner