Tanushree Dutta: “पाण्यात विष मिसळून मारण्याचा प्रयत्न केला", तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तनुश्रीने हे आरोप केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री तनूश्री दत्ताने भारतात मीटू मूव्हमेंट सुरु केली. २००८ साली प्रदर्शित झालेल्या 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील गाण्याच्या वेळी अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप तनूश्री दत्ताने केला होता. नाना पाटेकरांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले. पण तनूश्रीने केलेल्या आरोपांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीला धक्काच बसला होता. आता तनुश्रीने पुन्हा काही गंभीर आरोप केले आहेत.
तनुश्रीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, 'अनेकदा मला जीवेमारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.' एकदा तनूश्रीच्या कारचे ब्रेक फेल करण्यात आले होत. तर दुसऱ्यांदा तिला मारण्यासाठी पाण्यात काही तरी मिसळण्यात आले होते.
वाचा: चटर पटर बस झाली भाऊ; बिग बॉस मराठी ४चे टायटल साँग पाहिलेत का?
गाडीच्या ब्रेक फेल करण्यात आले
उज्जेनमध्ये असताना तनुश्रीच्या गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले होते. तसेच अनेकदा तिच्या गाडीत बिघाड करण्यात आला. एकदा कर तनुश्रीच्या कारचा भीषण अपघातसुद्धा झाला. त्यानंतर काही महिने तिला अंथरुणात घालवावे लागले.
'त्यावेळी माझ्या हत्येचा कट रचला जात होता. माझ्या पिण्याच्या पाण्यात विष मिसळल्याचे कळाले होते. त्यासाठी माझ्या घरात एक बाई पाठण्यात आली होती. ती बाई काम करत असताना मी सतत आजारी पडायचे. जेव्हा माझ्या पाण्यात विष मिसळलं तेव्हा मला खात्री पटली' असा खुलासा तनुश्रीने केला.
पुढे ती म्हणाली, 'मला पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करायचे होते. पण मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. बॉलिवूड माफिया अशी कामे करतात. या सगळ्यामागे तेच लोक आहेत ज्यांची नावं मी MeToo मोहिमेअंतर्गत उघड केली होती.'
विभाग