Premachi Gostha: मिहिकाचे लग्न झालेले पाहून मिहिरला बसला धक्का, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Gostha: मिहिकाचे लग्न झालेले पाहून मिहिरला बसला धक्का, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय घडणार?

Premachi Gostha: मिहिकाचे लग्न झालेले पाहून मिहिरला बसला धक्का, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये आज काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 30, 2024 03:43 PM IST

Premachi Gostha update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आला आहे. मिहिकाने थेट हर्षवर्धनशी लग्न केले आहे. हे मिहिरला कळाल्यावर त्याची काय आवस्था होणार हे आजच्या भागात कळणार आहे.

premachi goshta
premachi goshta

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत रोज काही तरी नवे घडत असते. मिहिकाने हर्षवर्धनशी लग्न केल्याचे कळाच मुक्ता सागरला घेऊन त्यांच्या घरी जाते. ती मिहिकाला समजावण्याचा प्रयत्न करते. पण ती काहीही ऐकून घ्यायला तयार नसते. ती उलट मुक्ता आणि सागरला सुनावते. त्यानंतर मुक्ता तेथून निघून येते. मिहिकाच्या वागण्याने मुक्ता इतकी दुखावली गेली आहे की तिला काहीच सुचत नाहीये. पण काही तरी कारण असणार असे सतत मुक्ताला वाटत असते.

सावनी आली गिफ्ट घेऊन

मुक्ता आणि सागर हर्षवर्धनच्या घरातून निघून जातात. त्यानंतर सावनी तेथे येते. सावनी सोबत गिफ्ट घेऊन आली आहे. ती जबरदस्ती ते गिफ्ट मिहिकाच्या हातात टेकवते. त्यानंतर ती हर्षवर्धनला धमकी देते की आज तुझा चेहरा दिसला. पण पुन्हा दिसला तर मी तुला उद्धवस्त केल्याशिवाय सोडणार नाही. ती तेथून निघून जाते. पण नंतर मिहिकाला मात्र प्रचंड त्रास होतो. तिला रडू अनावर होते. ती स्वत:चा राग करते कारण ती मुक्ताला वाटेल तसे बोलली आहे.

मिहिकाने का केले लग्न?

मिहिकाला लग्नाच्या आधी हर्षवर्धनचा फोन येतो. तो फोन करुन तुझे मेडिकल रिपोर्ट्स मागवले आहेत, आपल्यात जे झाले ते सिद्ध करण्यासाठी असे बोलतो. ते ऐकून मिहिकाला धक्का बसतो. त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो की जर याविषयी सर्वांना कळाले तर तुझ्या घरच्यांची बदनामी होईल असे देखील म्हणतो. त्यानंतर हर्षवर्धन मिहिकाला माझ्याशी लग्न कर असे सांगतो. मिहिकाला काही सुचेनासे होते. शेवटी ती हर्षवर्धनच्या जाळ्यात अडकते आणि लग्न करते.
वाचा: 'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी

मिहिरला कळाले मिहिकाचे सत्य

मिहिर मिहिकाला शोधत असते. शेवटी तिला आवडतात ते गिफ्ट घेऊन तो सागरच्या घरी जातो. तेवढ्यात मिहिका गळ्यात मंगळसूत्र घालून, साडी नेसून हर्षवर्धनला घेऊन सागरच्या घरी जाते. मिहिकाला असे पाहून मिहिरला धक्काच बसतो. त्याला समजत नसते नेमकं काय सुरु आहे. मिहिका स्वत:च्या तोंडाने त्याला लग्न केल्याचे सांगते. ते ऐकून मिहिरला मोठा धक्काच बसतो. त्यानंतर इंद्रा मिहिकाच्या कानशिलात लगावते. आता मिहिर स्वत:ला सावरु शकेल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.

Whats_app_banner