Satvya Mulichi Satavi Mulagi: नेत्राची दिव्य शक्ती बनणार अद्वैतसाठी वरदान?
नेत्रा तिच्या दिव्यशक्तीच्या बळावर अव्दैतचा जीव वाचवू शकणार आहे की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. प्रत्येक दिवशी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्याची क्षमता या मालिकेच्या कथेत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. आता या मालिकेत एक नवे वळण आले आहे.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात. तिला हिणवतात म्हणून नेत्रा गाव सोडून जाते. मालिकेत येत्या काही भागांमध्ये नेत्रालाला अपघात होतानाचे संकेत दिसणार आहेत.
वाचा : शुद्ध तूपातील पुणेकर, इथे शुद्ध हवा मिळत नाही; वर्षा उसगावकरांच्या हवाहवाईचा ट्रेलर चर्चेत
या अपघातामध्ये अव्दैतचा जीव धोक्यात आहे, नेत्रा तिच्या दिव्यशक्तीच्या बळावर अव्दैतचा जीव वाचवू शकणार आहे की नाही? ते पुढील भागांमध्ये पहायला मिळणार आहे. नेत्राची दिव्यशक्ती बनेल का अद्वैतसाठी वरदान? हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. त्यामुळे सर्वजण आगामी भागाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
विभाग