रिंकू राजगुरू हे नाव आज अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला माहित आहे . अर्थात पहिल्याच सिनेमामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिने तिच्या कामाची पोचपावती सुद्धा दिली होती . 'सैराट'सारख्या वास्तववादी चित्रपटात काम करत रिंकूने सर्वांची मने जिंकली. आता रिंकू लग्नबंधनात कधी अडकणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत स्वत: रिंकूने वक्तव्य केले आहे.
रिंकू ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकताच तिने 'आस्क मी अ क्वेशन'च्या माध्यमातून चाहत्यांशी गप्पा मारल्या. त्यावेळी एका चाहत्याने रिंकूला लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्याने रिंकूला 'लग्नच करू नकोस' असे म्हटले. त्यावर रिंकूने 'डन' असे म्हटले आहे. त्यानंतर दुसऱ्या एका यूजरने "मराठीमधील तुझे आवडते गाणे कोणते?" याचे उत्तर देत अभिनेत्रीने लिहिले की,"जोगवा." तिसऱ्या एका यूजरने "केदारनाथची ट्रिप कशी झाली" असा सवाल केला. त्यावर रिंकूने "अविस्मरणीय" असे म्हटले.
वाचा: 'ऐका दाजीबा' गाण्यावर मलायकाने धरला ठेका, Video Viral
रिंकूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'खिल्लार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी तिचा 'झुंड' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तसेच ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटांतही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. त्यासोबतच तिची १०० डेज ही सीरिज देखील आली होती.
संबंधित बातम्या