'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया

'माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं', बिग बी आणि जया बच्चनच्या लग्नावर अशी होती वडिलांची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 24, 2024 08:07 AM IST

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा एक किस्सा आहे ज्याबद्दल चाहत्यांना क्वचितच माहिती असेल. चला जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन

अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात पॉवरफुल कपल्सपैकी एक आहे. दोघांनीही आपल्या नात्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. पण प्रत्येक अडचणीमुळे त्यांचं नातं घट्ट होत गेलं आहे. दोघांचं लग्न झालं तेव्हा त्यात फक्त कुटुंबीय आणि जवळचे मित्र-मैत्रिणीच सामील होते. या दोघांचे लग्न होत आहे हे अनेकांना माहितही नव्हते. अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या आत्मचरित्रात दोघांच्या लग्नाबद्दल लिहिलं आहे आणि त्यांचं लग्न साधं का होतं हे स्पष्ट केलं आहे.

खासगीत पार पडले लग्न

जया बच्चन आणि बिग बींनी लग्न केले तेव्हा अमिताभ सुपरस्टार होते. त्यानंतर जया यांच्या कुटुंबियांनी ठरवले की, हे लग्न त्यांच्या मधल्या घरात नाही तर मित्राच्या घरी होईल. हरिवंश राय यांनी याविषयी लिहिले आहे की, 'अमिताभ यांच्या शेजाऱ्यालाही आपलं लग्न आहे हे माहित नव्हतं. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रित करण्यात आले होते. इंदिरा गांधी येऊ शकल्या नाहीत तरी त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांना पाठवले होते.'

बंगाली रीतिरिवाजानुसार लग्न

पुढे हरिवंश राय यांनी म्हटले की, 'जया यांच्या आई-वडिलांना बंगाली रीतीरिवाजानुसार लग्न करायचे होते, पण आम्हाला काहीच अडचण नव्हती. पहिला टप्पा होता वरपूजा ज्यात जयाचे वडील भेटवस्तू घेऊन अमिताभ यांच्या घरी आले होते. यानंतर अमिताभ यांचे वडीलही जया यांच्या घरी गेले आणि त्यांच्या लक्षात आले की, जया वगळता त्यांना तिथे पाहून कोणीही खूश नव्हते.'

जयाचे वडील काय म्हणाले?

जयाच्या लग्नाला वडिलांचा विरोध असल्याचे हरिवंश राय बच्चन यांनी सांगितले. ते म्हणाले, 'हळदीचा सोहळा झाला आणि आम्ही लग्नासाठी तिथे पोहोचलो तेव्हा जया ब्राइडल आउटफिटमध्ये होती. पहिल्यांदाच ती मला पाहून थोडी लाजली होती आणि त्यात ती खूप सुंदर दिसत होती. जेव्हा आम्ही लग्नानंतर निघालो तेव्हा अमिताभ सारखा जावई मिळाला म्हणून मी जयाच्या वडिलांचे अभिनंदन केले. मला वाटले ते जयाबद्दलही असेच म्हणतील. पण त्यांनी तसे न म्हणता माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले असे म्हटले.'
वाचा: एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

अमिताभ आणि जया यांचा विवाह ३ जून १९७३ रोजी झाला होता. त्यांना श्वेता बच्चन आणि अमिताभ बच्चन ही दोन मुले आहेत. या दोघांच्या लग्नाला ५१ वर्षे झाली आहेत. तरीही देखील ते दोघेही कायम एकत्र असल्याचे पाहायला मिळत आहे.

Whats_app_banner