Gharoghari Matichya Chuli: अखेर सारंग घरी परतला; जानकीमुळेच त्याचा जीव वाचला! पण कसा? होणार उलगडा
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gharoghari Matichya Chuli: अखेर सारंग घरी परतला; जानकीमुळेच त्याचा जीव वाचला! पण कसा? होणार उलगडा

Gharoghari Matichya Chuli: अखेर सारंग घरी परतला; जानकीमुळेच त्याचा जीव वाचला! पण कसा? होणार उलगडा

Published Aug 17, 2024 02:13 PM IST

Gharoghari Matichya Chuli 17 August 2024 Serial Update: सारंगचा जीव वाचणार असून, त्याला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. सारंग घरी परतल्यावर जानकी वहिनी त्याची आरती करण्यासाठी पुढे जाणार आहे.

Gharoghari Matichya Chuli 17 August 2024
Gharoghari Matichya Chuli 17 August 2024

Gharoghari Matichya Chuli 17 August 2024 Serial Update: ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत आता आनंदमय वळण येणार आहे. या मालिकेत सारंगचा अपघात झाल्यापासून सगळेच खूप टेन्शनमध्ये होते. इतके दिवस सारंगचा ठावठिकाणा देखील कळत नव्हता. मात्र, आता हृषिकेशच्या अथक प्रयत्नानंतर त्याला अखेर सारंग सापडला आहे. सारंग अतिशय गंभीर जखमी झालेला असून, त्याच्यावर उपचार करण्यासाठी एखादं मोठं हॉस्पिटल गाठावं लागणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितल्यावर हृषिकेश तातडीने सारंगला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता.

आता डॉक्टरांनी देखील सारंगवर तातडीने उपचार सुरू केले होते. मात्र, त्याच्या शरीरातून खूप रक्त गेल्याचे डॉक्टरांनी कुटुंबियांना संगीतीतले. इतकंच नाही तर, सारंगचा रक्तगट हा अतिशय दुर्मिळ असल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितलं होतं. सारंगचा रक्तगट हा ओ निगेटिव्ह असून, या रक्तगटाचं रक्त कुठेच मिळत नसल्याचं देखील डॉक्टर टेन्शनमध्ये येऊन बोलणार आहे. तर, हृषिकेश आणि शरयू यांचा रक्तगट वेगळा असल्याने दोघेही रक्तदान करू शकलेले नाहीत. आता रक्त कुठून आणायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र, त्याच वेळी जानकीने सौमित्रला बोलावून घेतले. सौमित्रचा रक्तगट ओ निगेटिव्ह असल्याचे जानकीला माहित होते.

Tharala Tar Mag: प्रतिमा आत्या स्वतः प्रयत्न करणार! नाणं बघून आठवणी परत येणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

सौमित्रच्या येण्याने सारंगचा जीव वाचणार!

तर, वहिनीच्या एका हाकेवर सौमित्र देखील धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने वेळेवर रक्त दिल्याने आता सारंगचा जीव वाचणार आहे. ‘तुम्ही भाऊ बहीण एकत्र असताना कुणालाच काही होणार नाही. मी आपलं कुटुंब तुटू देणार नाही’, असं जानकी अतिशय धीराने म्हणते. आता सारंगचा जीव वाचणार असून, त्याला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. सारंग घरी परतल्यावर जानकी वहिनी त्याची आरती करण्यासाठी पुढे जाणार आहे. मात्र, सुमित्रा आई जानकीला रोखणार आहे. जानकीच्या हातातील ताट त्या ऐश्वर्याकडे देणार आहेत. यामुळे जानकी आणि हृषिकेशला खूप वाईट वाटणार आहे. आता ऐश्वर्या आरतीसाठी पुढे येताच सारंग तिला रोखणार आहे.

सारंग घरी परतणार!

सारंगने ऐश्वर्याला रोखलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटणार आहे. यावेळी सारंग सगळ्यांना सांगणार आहे की, ‘ऐश्वर्या नाही, मला जानकी वहिनीच ओवाळेल. आज मी जे तुमच्यासमोर जिवंत आलो आहे, ते केवळ जानकी वहिनीमुळे.. तिच्यामुळेच माझा जीव वाचला आहे.’ आता सारंग असं का म्हणतोय, हे कुणाच्याच लक्षात आलेलं नाही. आता तो स्वतः याचा उलगडा करणार आहे.

Whats_app_banner