गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबीयांमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ऐश्वर्याने जलसा बंगला सोडला असून ती माहेरी राहायला गेली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच बिग बींनी एक बंगला श्वेता बच्चन नंदाच्या नावावर केल्यामुळे चर्चांना उधाण आले. पण आता बच्चन कुटुंबीय आराध्याच्या शाळेत एकत्र जाताना दिसले.