Bollywood Nostalgia Filmy Kissa : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिव्या भारती हिच्या अकाली निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारी दिव्या करिअरच्या शिखरावर होती. अवघ्या तीन वर्षांत तिने २१ चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी १३ चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीचा मोठा भाग होते. त्याचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. अभिनेत्रीच्या तिच्या मृत्यूच्या दरम्यान देखील अनेक चित्रपटांचे चित्रीकरण करत होती, त्यापैकी एक म्हणजे आयशा झुल्कासोबत 'रंग' हा चित्रपट होता.
दिव्याच्या मृत्यूनंतरही तिची उपस्थिती चित्रपटाच्या सेटवर जाणवत होती. दिव्याची जवळची मैत्रीण आणि सहकारी कलाकार असलेली अभिनेत्री आयशा झुल्काने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आठवणी सांगितल्या. आयशा म्हणाली की, जेव्हा तिच्या ‘रंग’ चित्रपटाचा ट्रायल शो सुरू होता, तेव्हा एक विचित्र घटना घडली. दिव्या भारतीला पडद्यावर तिची एक झलक दिसताच अचानक थिएटरचा पडदा कोसळला. हे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर या चित्रपटाचे अनेक डबिंग सेशन रद्द करावे लागल्याचे देखील तिने सांगितले. आयशा म्हणाली की, मी अनेक रात्री झोपले नाही. इंडस्ट्रीतील अशा मोजक्या लोकांपैकी ती एक होती, ज्यांना दिव्याच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम मिळाली होती.
आयशाने दिव्याचा स्वभाव आणि लाईफस्टाईलबद्दलही सांगितले. ती म्हणाले की, ‘दिव्या नेहमी घाईत असायची. तिचं प्रोफेशनल करिअर असो किंवा पर्सनल लाईफ, तिला प्रत्येक गोष्ट लवकरात लवकर साध्य करायची होती. आयशाच्या म्हणण्यानुसार, दिव्याला वाटत होतं की तिच्याकडे वेळ कमी आहे, म्हणून ती सर्व काही लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करायची.’
अभिनेत्रीच्या मृत्यूचं गूढ उकलेना!
याशिवाय दिव्याची आणखी एक मैत्रीण आणि अभिनेत्री गुड्डी मारुतीनेही तिच्या मृत्यूशी संबंधित एक घटना शेअर केली होती. अपघाताच्या रात्री दिव्या आपल्या अपार्टमेंटच्या खिडकीतून पडली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांना ती पडलेली दिसली. त्यानंतर जेव्हा लोक दिव्याच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना तोंड रक्ताने माखलेली मांजर दिसली, जी सर्वांनाच घाबरवून टाकणारी होती. गुड्डी मारुतीने असेही सांगितले होते की, दिव्या अनेकदा घराच्या बाल्कनीत पाय लटकवून बसायची. कधी कधी ती तिला याचा इमारतीतून हाक मारत असे. अभिनेत्रीच्या निधनाने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. दिव्या भारतीचा अकाली मृत्यू आजही बॉलिवूडमधील सर्वात मोठी गूढ घटना मानली जाते.
संबंधित बातम्या