मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kangana Ranaut: सलमानला मिळालेल्या धमकीवर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली ‘घाबरू नकोस...’

Kangana Ranaut: सलमानला मिळालेल्या धमकीवर कंगनाची प्रतिक्रिया; म्हणाली ‘घाबरू नकोस...’

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 01, 2023 04:06 PM IST

Kangana Ranaut on Salman Khan Death Threat : अभिनेत्री कंगना रनौत नुकतीच तिच्या हरिद्वार भेटीमुळे चर्चेत आली आहे. यादरम्यान सलमान खानला मिळालेल्या धमक्यांवर देखील तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Kangana Ranaut-Salman Khan
Kangana Ranaut-Salman Khan

Kangana Ranaut on Salman Khan Death Threat : बॉलिवूडची पंगा क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रनौत अनेकदा तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे मीडियामध्ये चर्चेत असते. आता कंगनाने अभिनेता सलमान खान याला मिळणाऱ्या जीव मारण्याच्या धमक्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री कंगना रनौत नुकतीच तिच्या हरिद्वार भेटीमुळे चर्चेत आली आहे. यादरम्यान सलमान खानला मिळालेल्या धमक्यांवर देखील तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्ती म्हणाली की, ‘देश आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षित हातात आहे. त्यामुळे सलमान खानला सुरक्षेबाबत घाबरण्याचे काही कारण नाही.’

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कंगना रनौत म्हणाली की, ‘आम्ही कलाकार आहोत. केंद्राने सलमान खानला सुरक्षा पुरवली आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सुरक्षा मिळत आहे. त्यामुळे घाबरण्यासारखे काही नाही. जेव्हा मला धमकी देण्यात आली होती, तेव्हा मलाही सरकारने सुरक्षा दिली होती. आज देश सुरक्षित हातात आहे. त्यामुळेच आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.’ रविवारी उत्तराखंडमधील हरिद्वारला पोहोचलेल्या कंगना रनौत गंगा आरती देखील केली. यानंतर आता कंगना केदारनाथलाही जाणार आहे. तिच्या या दौऱ्याबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, ‘मला केदारनाथ धामला भेट द्यायची नेहमीच इच्छा होती आणि आता ते प्रत्यक्षात घडणार आहे.’

Aryan Khan: आर्यन खानच्या क्लोदिंग ब्रँडच्या किंमती पाहून नेटकरी चक्रावले! मीम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. तर, अभिनेता सलमान खान देखील त्याला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांवर पहिल्यांदाच बोलला आहे. 'आप की अदालत' या टीव्ही शोमध्ये बोलताना सलमान म्हणाला की, ‘असुरक्षिततेपेक्षा सुरक्षा चांगली आहे. होय, मला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आता रस्त्यावर सायकल चालवणे आणि एकटे कुठेही जाणे शक्य नाही.’

यावर बोलताना सलमान खान पुढे म्हणाला की, ‘आता माझ्यासमोर समस्या अशी आहे की, जेव्हा मी बाहेर पडत असतो, तेव्हा माझ्यासोबत खूप सुरक्षा असते. त्यामुळे इतर लोकांनाही त्रास होतो. अशावेळी रस्त्यावर देखील ट्रॅफिक होते. मग, लोक माझ्याकडे टक लावून पाहतात. माझ्या चाहत्यांना त्रास होतो ही एक गंभीर बाब आहे.’

IPL_Entry_Point