Actress Slapped Salman Khan : बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने पडद्यावर सहाय्यक भूमिका देखील गाजवल्या. ते चित्रपटातील मुख्य पात्रांसोबत थोड्या वेळासाठीच पडद्यावर दिसले, पण त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. अशीच एक कलाकारांपैकी एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी. हिमानी यांच्याबद्दल अनेक रंजक किस्से आहेत. या अभिनेत्रीने एकदा सलमान खानच्या कानाखाली जाळ काढला होता.
हिमानी शिवपुरी यांनी १९८४मध्ये 'अब आयेगा मजा'मधून करिअरला सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी बॉलिवूडमध्ये आपले खास स्थान निर्माण केले आहे. हिमानी यांनी सलमान खानच्या 'हम आपके है कौन', शाहरुख खानच्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' आणि गोविंदाच्या 'हिरो नंबर १' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतून आपल्या अभिनयाने मोहिनी घातली. याशिवाय हिमानीने 'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है', 'हम साथ साथ हैं' आणि 'दिलवाले' यांसारख्या चित्रपटांतूनही आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. सध्या हिमानी शिवपुरी 'हप्पू की उल्टन पलटन' या शोमध्ये 'कट्टो अम्मा’च्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट आणि टेलिव्हिजन या दोन्ही क्षेत्रात त्यांची यशस्वी कारकीर्द आहे. मात्र, व्यावसायिक जीवनात प्रचंड यश मिळूनही त्यांना वैयक्तिक जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले.
हिमानी यांनी चित्रपटाच्या सेटवर सलमान खानला कानाखाली मारली होती. 'हम आपके है कौन' चित्रपटात काम करत असताना एका सीनमध्ये सलमानने अचानक त्यांना उचलून घेतले होते. या अचानक कृतीमुळे गडबडलेल्या हिमानी यांनी दबंग खानला थप्पड मारली. याविषयी हिमानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'मी सलमानला थप्पड मारली आणि सर्वांना धक्का बसला, पण नंतर त्या थप्पडचाही चित्रपटात समावेश करण्यात आला.'
हिमानी यांचा विवाह काश्मिरी पंडित आणि अभिनेता ज्ञान शिवपुरी यांच्याशी झाला होता, ज्यांचे १९९५मध्ये निधन झाले होते. त्यांना कात्यायन नावाचा मुलगा आहे. हिमानी यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'चे शूटिंग करत होत्या, तेव्हा त्यांना पतीच्या आकस्मिक निधनाची बातमी मिळाली होती. ही बातमी ऐकून हिमानी यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नव्हते. त्या वेळेचा संदर्भ देत हिमानी म्हणाल्या, 'जेव्हा मी डीडीएलजेच्या क्लायमॅक्स सीनचे शूटिंग करत होते, तेव्हा मला माझ्या पतीच्या निधनाचा फोन आला. मला ताबडतोब घरी जावे लागले आणि हरिद्वारमध्ये त्यांचे अंतिम संस्कार केले गेले.’
संबंधित बातम्या