Bigg Boss Marathi 5: पहिल्याच दिवशी निक्की तंबोळी आणि वर्षा उसगावकरमध्ये मेकअपवरून वाद
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 5: पहिल्याच दिवशी निक्की तंबोळी आणि वर्षा उसगावकरमध्ये मेकअपवरून वाद

Bigg Boss Marathi 5: पहिल्याच दिवशी निक्की तंबोळी आणि वर्षा उसगावकरमध्ये मेकअपवरून वाद

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 29, 2024 01:43 PM IST

Bigg Boss Marathi 5 Update: बिग बॉस मराठी सिझन ५ नुकताच सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी स्पर्धकांनामध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi

'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला. यावेळी अभिनेता रितेश देशमुखने सूत्रसंचालन केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे करुन सोळा स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एण्ट्री झाली. त्यामध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर, अभिनेत्री निक्की तंबोळी, गायक अभिजीत सावंत आणि इतर स्पर्धकांचा समावेश आहे. आज पासून बिग बॉसचे स्पर्धक घरात एकत्र दिसत आहे. पण पहिल्याच दिवशी निक्की आणि वर्षा उकसगावर यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले आहे.

काय झालं नेमकं?

'बिग बॉस मराठी ५' या रिअॅलिटी शो सकाळपासून सुरुवात झाली आहे. या शोमध्ये सकाळी सगळे स्पर्धक उठले आहेत. पण काही वेळातच घरातील पाणी गेले आहे. त्यानंतर बिग बॉसने स्पर्धकांना एकत्र लिविंग रुममध्ये जमा होण्याचा आदेश दिला. सर्वजण येऊन बसतात. मात्र, वर्षा उसगावकर या मेकअप करत बसलेल्या असतात. त्यांचा मेकअप सुरुच असतो. सर्व स्पर्धक सोफ्यावर येऊन बसतात. पण वर्षा मात्र कोणाचेही ऐकायला तयार नसतात.

दरम्यान, निक्की तंबोळी त्यांना बोलवायला जाते. तेव्हा त्या निक्कीवर चिडतात. 'तू मेकअप करुन, आवरुन बसली आहेस. मी अशीच नाही येऊ शकत. मला पण आवरु द्या' असे वर्षा बोलतात. ते ऐकून निक्की तेथून निघून जाते. निक्की सगळ्यांना जाऊन सांगते. सर्वजण त्यांच्यावर चिडतात. आता वर्षा उसगावकर सगळ्या स्पर्धकांशी याविषयावरुन भांडणार की शांत बसणार हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

बिग बॉसच्या घरातील पाणी गेलं

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनच्या पहिल्या एपिसोडचा पहिला प्रोमो नुकताच आऊट झालाय. प्रोमोमध्ये पहिल्याच दिवशी घरात पाणी येत नसल्याने सदस्यांची अडचण झालेली पाहायला मिळत आहे. "पाणी सगळं गेलेलं आहे, 'बिग बॉस' पाणी, सगळ्यात आधी आंघोळ करायची असते तर त्याच्यासाठी पाणी नाही, असं म्हणत स्पर्धक 'बिग बॉस'ला पाणी सोडण्यास सांगत आहेत. पाणी अत्यावश्यक बाब असल्याने घरातील सर्व सदस्य हतबल झाले आहेत. पाणी मिळण्यासाठी काकुळतीने 'बिग बॉस'ला ते विनंती करत आहेत. त्यावर बिग बॉस म्हणतात,"आता फक्त घरातलं पाणी गेलंय...थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळेल". त्यामुळे पहिल्याच दिवशी स्पर्धकांना मोठा धक्का बसलाय.
वाचा: एकेकाळी टॉपलेस फोटोमुळे खळबळ माजवणाऱ्या वर्षा उसगावकर बिग बॉसच्या घरात

'बिग बॉस मराठी'च्या नव्या घराचं दार अखेर उघडलं आहे. पण यंदा चक्रव्यूहामुळे सदस्यांना त्यांच्याप्रमाणे खेळता येणार आहे. सदस्यांचा खेळ पलटवून लावायला आणि त्यांना पेचात अडकवायला 'बिग बॉस' आणि रितेश भाऊ सज्ज आहेत. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांना प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच बेड, बाथरुम, खाण्यापिण्याच्या सामानासाठी किंमत मोजावी लागणार आहे.

Whats_app_banner