Bigg Boss Marathi 5: बिग बॉसने दिला मोठा धक्का! ९ लाख रुपये घेऊन स्पर्धक घराबाहेर; आता उरले टॉप ५
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Marathi 5: बिग बॉसने दिला मोठा धक्का! ९ लाख रुपये घेऊन स्पर्धक घराबाहेर; आता उरले टॉप ५

Bigg Boss Marathi 5: बिग बॉसने दिला मोठा धक्का! ९ लाख रुपये घेऊन स्पर्धक घराबाहेर; आता उरले टॉप ५

Published Oct 06, 2024 07:31 PM IST

Bigg Boss Marathi 5 Top 6 Elimination: सगळ्या स्पर्धकांसमोर एक मोठी ऑफर ठेवली गेली. यात ९ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती.

Bigg Boss Marathi 5 Top 6 Elimination
Bigg Boss Marathi 5 Top 6 Elimination

Bigg Boss Marathi 5 Top 6 Elimination: ‘बिग बॉस मराठी ५’च्या अंतिम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. बिग बॉस मराठी ५च्या घरात टॉप ६ स्पर्धक शिल्लक राहिले होते. मात्र, शेवटच्या दिवशीही बिग बॉसने या खेळात ट्वीस्ट आणला होता. सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत हे स्पर्धक फायनलमध्ये खेळण्यास उतरले होते. मात्र, याच वेळी घरात रितेशने एन्ट्री घेतली आणि सगळ्या स्पर्धकांसमोर एक मोठी ऑफर ठेवली. यात ९ लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती.

बिग बॉसच्या या ट्वीस्टमध्ये रितेश देशमुख याला एक बॅग घेऊन घरात पाठवण्यात आले होते. या ब्रीफकेसमध्ये ७ लाख रुपयांची रक्कम घेऊन रितेश घरात गेला. यासोबतच त्याने सगळ्या स्पर्धकांना बोलावून ही ऑफर सांगितली. मात्र, ७ लाख रुपये घेऊन खेळ सोडून घराबाहेर जाण्यास कुणीही तयार झालं नाही. त्यानंतर आणखी एक ट्वीस्ट आणत ही रक्कम वाढवण्यात आली. ७ लाखांच्या ब्रीफकेससोबतच आणखी एक २ लाखांची ब्रीफकेस ठेवण्यात आली. त्यामुळे ही रक्कम ७ लाखांवरून ९ लाखांवर गेली. तर, विजेत्याला मिळणारी रक्कम ही १४ लाख असणार होती. त्यामुळे या तुलनेत ९ लाख ही रक्कम देखील मोठी होती. आता ही रक्कम घेऊन कोण बाहेर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

जान्हवी किल्लेकर पडली बाहेर!

रितेशने १,२,३ म्हणताच त्या स्पर्धकाने जाऊन बजर वाजवून ती ब्रीफकेस घ्यायची होती. रितेशचा काऊंट देताच जान्हवी किल्लेकर हिने पैशांची बॅग घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. तर, रितेशच्या हातातील पाकिटात देखील जान्हवीचे नाव निघाल्याने तिचा निर्णय अगदी अचूक ठरल्याचे सिद्ध झाले आहे. जान्हवीने स्व:खुशीने हे पैसे स्वीकारून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या प्रवासासाठी तिने सगळ्यांचे आभार मानले.

जान्हवी किल्लेकर ही पहिल्या दिवसापासून या खेळात उतरली होती. इतकंच नाही, तर तिने आपल्या दमदार खेळाने प्रेक्षकांची मने देखील जिंकली. सुरुवातीच्या २ आठवड्यात तिने या घरात चांगलाच धुमाकूळ घातला होता. या काळात तिने अनेक चुकाही केल्या होत्या. ज्याची शिक्षा म्हणून तिला तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, यानंतर तिने आपला खेळ सुधारला आणि प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली.

Whats_app_banner