Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?

Shahrukh Khan: सरकारच्या एका चुकीमुळे शाहरुख खानला लागली लॉटरी, जाणून नेमकं प्रकरण काय?

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jan 26, 2025 07:32 AM IST

Shahrukh Khan: शाहरूख खानला त्याच्या मन्नत या बंगल्यामुळे ९ कोटी रुपये मिळणार आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घेऊया..

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan (PTI)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याचा मन्नत बंगला देखील प्रसिद्ध आहे. वांद्रे येथे असलेल्या शाहरुखच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळते. शाहरुख देखील दर रविवारी बंगल्याच्या गच्चीवर जाऊन चाहत्यांची भेट घेतो. शाहरूखने अनेक मुलाखतींमध्ये मन्नत हा बंगला माझ्यासाठी लकी ठरला आहे असे म्हटले आहे. आता आता हा बंगला शाहरुख खानला पुन्हा एकदा नऊ कोटी रुपये देणार आहे, जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण काय आहे?

काय आहे सरकारची चूक?

शाहरुखने २०१९मध्ये मन्नत हा बंगला खरेदी केला. त्यावेळी त्याने बंगल्याचा मालकी हक्क मिळवण्यासाठी २५ टक्के रक्कम जमा केली होती. त्याची आधारभूत रक्कम २७.५ कोटी रुपये होती. मात्र, ही रक्कम जमिनाच्या आधारावर नाही तर संपूर्ण बंगल्याच्या आधारावर काढण्यात आली होती. शाहरूखची पत्नी गौरी खानला ही चूक लक्षात येताच तिने सरकारच्या निदर्शनात आणली. तसेच परतफेडीची मागणी देखील केली. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, सरकार ही चूक सुधारण्यासाठी शाहरुखला ९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे.
वाचा: महाकुंभ मेळ्यामधील व्हायरल झालेल्या मोनालिसाचे नशीब फळफळलं, सिनेमामध्ये करणार काम?

मन्नत बंगल्याविषयी

शाहरुखच्या या बंगल्याबाबत बोलायचे झाल्यास शाहरुखचा मन्नत बंगला हा बांद्रा पश्चिमेला आहे. २४४५ स्केअर फूट एवढं या बंगल्याचं क्षेत्रफळ आहे. शाहरुख खाने याने आपल्या बंगल्याचा मालकी हक्क मिळवण्यासाठी २५ टक्के रक्कम जमा केली होती. याचवेळी सरकारकडून ही चूक झाली, त्यानंतर शाहरुख खानची पत्नी गैरी खानने ही चूक सरकारच्या लक्षात आणून दिली, आता त्याला नुकसानभरापाई म्हणून नऊ कोटी रुपये मिळणार आहेत.

Whats_app_banner