गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील दोन मोठ्या सिनेमांची चर्चा रंगली आहे. कारण हे दोन्ही सिनेमे दिवाळीच्या मुहूर्तावर आमनेसामने असणार आहेत. अभिनेता अजय देवगणचा 'सिंघम अगेन' आणि कार्तिक आर्यनस्टारर 'भूल भुलैया ३' शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर या दोघांची जबरदस्त टक्कर होणार आहे. अशा तऱ्हेने दोघांच्या निर्मात्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले आहे. आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे आणि दरम्यान, दोन्ही चित्रपटांवर परदेशात बंदी घालण्यात आली आहे. आता बंदी का घालण्यात आली आहे चला जाणून घेऊया...
'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' या दोन्ही चित्रपटांवर सौदी अरेबियात बंदी घालण्यात आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाने धार्मिक संघर्षामुळे अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटावर बंदी घातली आहे. चित्रपटाच्या कथेच हिंदू-मुस्लीम संघर्ष दाखवणारा असल्याने या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' या चित्रपटावर समलैंगिकतेमुळे बंदी घालण्यात आली आहे. रुह बाबा (कार्तिक आर्यन) चित्रपटात समलिंगी संदर्भांचा वापर करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सौदी अरेबियात प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्यास अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून दोन्ही ही सिनेमा सौदी अरेबियामध्ये बॅन करण्यात आले आहेत.
वाचा: लसणाच्या पाकळ्या खाऊन 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने काढले दिवस, विनय आपटेंना कळाले अन् बदलले आयुष्य
अनीस बज्मी दिग्दर्शित 'भूल भुलैया 3' चित्रपटात कार्तिकव्यतिरिक्त विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी हे कालाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर 'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगणसह अक्षय कुमार, करिना कपूर खान, दीपिका पदुकोण, सलमान खान, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
संबंधित बातम्या