गेल्या ३ महिन्यापासून सुरु असलेला मास्टरशेफ इंडिया सीजन ७ प्रवास नुकताच संपला. या प्रवासात शेवटी आसामचा नयनज्योती सैकियाने यंदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. हा सोनी टीव्हीचा लोकप्रिय कुकिंग रिअॅलिटी शो आहे. १३आठवडे प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या या शोचा काल रात्री ग्रँड फिनाले झाला. या शोला परीक्षक म्हणून शेफ रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा होते. या शोच्या फिनालेमध्ये या तिन्ही शेफसह अनुभवी शेफ संजीव कपूर होते ज्यांनी 'सिग्नेचर थ्री-कोर्स मील चॅलेंज' मधील ३ अंतिम स्पर्धकांना जज केले.
किती प्राइज मनी जिंकला मास्टरशेफ?
२५ लाख रुपयांचा धनादेश आणि 'मास्टरशेफ इंडिया'ची प्रतिष्ठित ट्रॉफी सोबतच नयनज्योतीला गोल्डन शेफचा कोटही देण्यात आला. तसेच शांत सरमाला यांना प्रथम उपविजेते म्हणून तर मुंबई, महाराष्ट्रातील सुवर्णा बागुल याना द्वितीय उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. प्रथम आणि द्वितीय उपविजेत्याला ५ लाखांचा धनादेश देण्यात आला आणि दोघांनाही धनादेशासह पदक प्रदान करण्यात आले.
काय आहे नयनज्योती सैकियाची प्रतिक्रिया?
नयनज्योती सैकिया म्हणाला की, "माझे एक साधे स्वप्न होते, मला फक्त मास्टरशेफ इंडियामध्ये जाऊन स्वयंपाक करायचा होता, पण आता मला वाटते की माझे आयुष्यातील सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. मी फक्त मास्टरशेफवर गेलो नाही तर मला एक ऍप्रन देखील मिळाला. शेफ विकास यांनी मला ऑडिशनच्या दिवसापासून खूप मदत केली आहे.
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझे वडील या सर्वांमध्ये सर्वात आनंदी आहेत. या व्यासपीठाने आम्हाला दिलेल्या संधींची मी कल्पनाही करू शकत नाही. या व्यासपीठाचा मी सदैव ऋणी राहीन."
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ओपनिंगला अमृता खानविलकर!
संबंधित बातम्या