Amitabh Bachchan: ‘अशा गोष्टींमध्ये जेव्हा आपली मुलं असतात...’; अभिषेकमुळे आले अमिताभ यांच्या डोळ्यांत पाणी!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amitabh Bachchan: ‘अशा गोष्टींमध्ये जेव्हा आपली मुलं असतात...’; अभिषेकमुळे आले अमिताभ यांच्या डोळ्यांत पाणी!

Amitabh Bachchan: ‘अशा गोष्टींमध्ये जेव्हा आपली मुलं असतात...’; अभिषेकमुळे आले अमिताभ यांच्या डोळ्यांत पाणी!

Updated Aug 16, 2023 02:41 PM IST

Amitabh Bachchan Cried: अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि याला कारण ठरला त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन. नुकताच हा प्रसंग अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधून चाहत्यांना सांगितला आहे.

Amitabh Bachchan
Amitabh Bachchan

Amitabh Bachchan Cried: बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या डोळ्यांत पाणी आले आणि याला कारण ठरला त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन. नुकताच हा प्रसंग अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमधून चाहत्यांना सांगितला आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांच्या मुलाचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘घूमर’ पाहिला. अभिषेक बच्चन याचा चित्रपट पाहताना अमिताभ बच्चन दोनदा रडले. या चित्रपटात अभिषेक बच्चन, सैयामी खेर आणि शबाना आझमी मुख्य भूमिकेत दिसले आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर या चित्रपटाविषयी आपले मत मांडले आहे.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘मी घूमर पाहिला, तोही सलग दोनदा... रविवारी दुपारी आणि पुन्हा रात्री. हा चित्रपट पाहिल्यानंतर आता मी काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. चित्रपटाच्या पहिल्याच फ्रेमने माझ्या डोळ्यांत पाणी आणले आणि जेव्हा तुमचे स्वतःचे मूल असे काहीतरी करत असते... तेव्हा डोळ्यांतील पाणी थांबवू शकत नाही.’

Manisha Koirala Birthday: ऑनस्क्रीन पित्याची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती मनीषा कोईराला!

चित्रपटातील त्याच्या प्रत्येक सीनने काही ना काही विचार मनात येतो. अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, ‘होय, चित्रपटाची कथा क्रिकेटच्या खेळाशी संबंधित आहे. या चित्रपटाची कथा एका मुलीच्या दृढ निश्चयाची आहे. पण, चित्रपटाचा अर्थ यापेक्षाही अधिक खोल आहे. कुटुंबाची ताकद आणि आईचा सहवास या चित्रपटात सुंदरपणे दाखवण्यात आले आहे. अतिशय सोप्या पद्धतीने चित्रपटात संघर्ष दाखवला गेला आहे. अनेक गुंतागुंतीच्या भावना त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने उलगडून दाखवणे ही दिग्दर्शक आर बाल्की यांची हातोटी आहे.’

यावेळी अमिताभ बच्चन यांनी जीवनात संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी एक संदेश दिला. त्यांनी लिहिले की, ‘आपण सर्वांनी जीवनात कधी ना कधी अपयशाचा सामना केला आहे, निराश झालो आहोत आणि पराभूत होणे म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण, विजय मिळाल्यावर कसे वाटते हे कळणे सर्वात मोठे आव्हान आहे, ज्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असतो. दाराला कुलूप असल्याचे आपल्याला तेव्हाच कळते, जेव्हा आपण आत जायचा प्रयत्न करतो. आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात आणि हा जीवनातील सर्वात मोठा धडा देखील आहे.’

Whats_app_banner