Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली 'त्या' मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली 'त्या' मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत

Allu Arjun: अल्लू अर्जुनने मागितली 'त्या' मृत महिलेच्या कुटुंबाची माफी, पुष्पा देणार २५ लाखांची आर्थिक मदत

Dec 07, 2024 11:26 PM IST

Allu Arjun Pushpa 2 : चित्रपटाच्या प्रिमीयरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटूंबाची माफी मागत त्यांनी २५ लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

अल्लू अर्जुन
अल्लू अर्जुन

अल्लू अर्जूनच्या'पुष्पा २' (Pushpa 2 ) ची जगभरात क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसाततब्बल ५०० कोटींचा टप्पा पार करत अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे.या चित्रपटात अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान चित्रपटाच्या प्रिमीयरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अल्लू अर्जूनने मृत महिलेच्या कुटूंबाची माफी मागत त्यांनी २५ लाखांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.

पुष्पा २ : द रूलच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक सुकुमार यांनी शनिवारी संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधला. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी झालेल्या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी घडलेल्या दुर्घटनेची कबुली देत या दोघांनी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या चाहत्याच्या कुटुंबीयांची माफी मागितली.

अल्लू अर्जुनने त्या कुटुंबाची मागितली माफी -

सुकुमार यांनी सर्वप्रथम स्टेजवर जाऊन पुष्पा २ : द रूल बनवल्याबद्दल आपल्या संपूर्ण टीमचे नाव घेऊन आभार मानले. भाषणाच्या शेवटी ते म्हणाले, "मी या चित्रपटावर ६ वर्षांहून अधिक काळ काम केले आहे, परंतु मी आता ३ दिवसांपासून आनंदी नाही कारण दिग्दर्शक नेहमीच संवेदनशील असतो. मी ३ वर्षे किंवा ६ वर्षे काम केले तरी मी आयुष्य घडवू शकत नाही. जे घडलं त्यामुळं माझं मन दु:खी झालं आहे. त्याबद्दल मला खूप खेद वाटतो... मी कुटुंबियांची माफी मागतो आणि तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही नेहमीच तुम्हाला पाठिंबा देऊ.

हा चित्रपट यशस्वी केल्याबद्दल अल्लू अर्जुनने जगभरातील प्रेक्षकांचे तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारने तिकिटे वाढवण्याची आणि प्रीमिअर करण्याची परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तेव्हा ते म्हणाले, "आम्हाला अत्यंत खेद आहे. नेमकं काय झालं ते आम्हाला कळलंच नाही. मी २० वर्षांपासून हे करत आहे (उद्घाटनाच्या दिवशी चित्रपटगृहात जाणे); मात्र अत्यंत दुर्दैवी आहे.

अल्लू अर्जुने सांगितले की, चित्रपटाच्या मध्यावर चित्रपटगृह सोडले होते कारण त्याला चाहत्याचा मृत्यू झाल्याचे समजले म्हणून नाही तर व्यवस्थापनाने त्याला सांगितले की यामुळे शांतता भंग होत आहे. मी हा चित्रपट पाहिला आणि व्यवस्थापनाने मला सांगितले की यामुळे समस्या उद्भवत आहेत म्हणून मी अर्ध्यावरच निघून गेलो. रेवतीचा मृत्यू झाल्याचं आम्हाला दुसऱ्या दिवशीच कळलं; मला धक्काच बसला.

या घटनेला उत्तर द्यायला मला ४८ तास का लागले, हे ही अर्जुनने स्पष्ट केले, 'मला मानसिक रिस्पॉन्स द्यायला वेळ लागला. मला स्थिर व्हायचे आहे; जे घडलं ते ऐकताच आम्हाला धक्का बसला. सुकुमार गारू खरोखरच भावूक झाले; आमची सगळी ऊर्जा गेली.

त्यानंतर त्याने शुक्रवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, त्याला चित्रपट बनवायला आवडतात त्यामुळे लोक चित्रपटगृहात त्याचा आनंद घेतात. असे काही घडले हे ऐकून मन दु:खी झाले. "मी दिलेले पैसे (२५ लाख रुपये) आम्ही त्यांच्यासाठी आहोत हे दाखवण्याचा एक संकेत आहे. मला त्यांना त्रास द्यायचा नाही; मी त्यांना त्यांची जागा देत आहे. त्यांचे नुकसान मी कधीच भरून काढू शकणार नाही, पण ते बरे झाल्यावर मी त्यांना भेटेन. मी त्यांना जमेल तशी मदत करेन, असे अल्लू म्हणाला.

माफी न मागितल्याबद्दल टीकेची झोड

अर्जुन हैदराबादच्या संध्या थिएटरमधून बाहेर पडल्याचा व्हिडिओ समोर आला तेव्हा काहींनी असा अंदाज लावला की त्याला चाहत्याच्या मृत्यूची माहिती मिळाली आहे आणि तो मुद्दा टाळण्यासाठी तो निघून जात आहे. त्यानंतर त्यांच्या टीमने कुटुंबाशी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधला असला तरी सोशल मीडियावर या मुद्द्याला प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. जेव्हा त्याने शोक व्यक्त करणारा व्हिडिओ टाकला तेव्हा लोकांनी त्याला कुटुंबाची माफी न मागितल्याबद्दल आणि दुर्घटनेतील त्याच्या भूमिकेची जबाबदारी न घेतल्याबद्दल टीका केली.

४ डिसेंबर रोजी अर्जुन त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डी आणि सहकलाकार रश्मिका मंदाना सोबत थिएटरमध्ये गेला होता, तेव्हा त्याला भेटण्यासाठी चेंगराचेंगरी झाली होती. यात एक महिला आणि तिचा लहान मुलगा जखमी होऊन बेशुद्ध पडले. महिलेचा मृत्यू झाला, तर तिच्या मुलाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अर्जुन, त्याची सुरक्षा पथक आणि थिएटर व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Whats_app_banner