बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. २००७मध्ये दोघांनी लग्न केले आणि दोघांना आराध्या नावाची एक मुलगी आहे. अभिषेक बच्चनने ऐश्वर्या राय बच्चनला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे, ज्यामुळे दोघांचे लग्न तुटणार आहे. पण खरंच तसं आहे का? अभिनेत्रीचं इन्स्टाग्राम अकाऊंट वेगळीच कहाणी सांगत आहे. कारण आजही ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते आणि ती म्हणजे तिचा नवरा अभिषेक बच्चन.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी घटस्फोटावर कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. ज्यामुळे हा मुद्दा चर्चेत येत आहे. अभिषेक बच्चनचे नाव त्याची को-स्टार अभिनेत्री निमरत कौरसोबत जोडले जात आहे. अभिषेक बच्चनने निमरतसोबतच्या जुन्या मुलाखतीच्या क्लिप व्हायरल होत आहेत. पण ऐश्वर्या रायचे अकाऊंट स्पष्टपणे सांगत आहे की दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे आणि दोघांमध्ये घटस्फोटासारखे काहीही नाही. मात्र, चाहते या जोडप्याच्या अधिकृत काही बोलण्याची वाट पाहत आहेत.
ऐश्वर्या राय बच्चनचे इन्स्टाग्रामवर १४.३ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. अभिनेत्रीने आतापर्यंत ३३९ पोस्ट केल्या आहेत. परंतु विशेष म्हणजे ती सोशल मीडियावर फक्त एका व्यक्तीला फॉलो करते आणि ती म्हणजे तिचा पती अभिषेक बच्चन. नुकतेच अभिषेक बच्चनला जेव्हा पॅपराझींनी पाहिले तेव्हा त्याला रेकॉर्डिंग करताना पाहून अभिनेत्री संतापली आणि तिने रेकॉर्डिंग थांबवण्यास सांगितले. अभिषेक बच्चनचे नाव निमरत कौरसोबत जोडले जात आहे. त्या दोघांनी 'दसवी' चित्रपटात काम केले आहे.
वाचा: नगरसेवकाने फसवून केले होते ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीशी लग्न, पहिल्या पत्नीने समोर आणले सत्य
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती मणिरत्नम दिग्दर्शित 'पोन्नयिन सेल्वन २' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती पुन्हा कोणत्या चित्रपटात दिसणार याविषयी माहिती समोर आलेली नाही. पण चाहते ऐश्वर्याला पुन्हा स्क्रीनवर पाहण्यासाठी आतुर आहेत. ऐश्वर्या ही जास्त करुन कमाई ही चित्रपट आणि जाहिरातींमधून होते. ती सर्वासाठी तगडे मानधन घेत असल्याचे बोलले जाते.
संबंधित बातम्या