मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेते मोहन राज यांचे निधन झाले आहे. वयाच्या ६१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहत्या घरात मोहन राज यांचा गुरुवारी मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार हे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.
मल्याळम इंडस्ट्रीमध्ये खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले मोहन राज हे गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते. गुरुवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे.
मोहन राज यांनी 'कीरीदम' या १९८९ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. इंडस्ट्रीमध्ये काम करण्यापूर्वी मोहन हे सरकारी नोकरी करत होते. पण त्यांचा पहिलाच चित्रपट हिट ठरला. त्यामधील त्यांची खलनायाकी भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. अनेकजण त्यांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी कीरीकदन म्हणून ओळखू लागले.
आवाज आणि चेहऱ्यावरील हावभावांमुळे मोहन राज यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील खलनायकाच्या भूमिकांना एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी कीरीदम या चित्रपटानंतर कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आजपर्यंत ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. काही वर्षांपूर्वी मोहन राज यांनी एका चित्रपट अॅक्शन सीन देखील दिला होता. हा सीन शूट करताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. पण त्यातून ते बरे होऊ शकले नाहीत.
वाचा: मुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला
२०२२मध्ये मोहन राज शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांच्या या अखेरच्या चित्रपटाचे नाव रोर्शच असे आहे. त्यापूर्वी त्यांचे कीरीदम, मिमिक्स परेड, उप्पुकंदम ब्रदर्स, हिटलर, मयावी हे चित्रपट तुफान हिट ठरले होते. जवळपास तीन दशके मोहन राज यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केले. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची वेगळी चर्चा रंगली होती.
संबंधित बातम्या