Aai Kuthe Kay Karte: साखरपुडा दणक्यात करण्यावरून ईशा आणि अरुंधतीमध्ये वाद
Aai Kuthe Kay Karte Upate: गेल्या काही दिवसांपासून ईशा आणि अनिशच्या साखरपुड्यावरुन देशमुखांच्या घरात वाद सुरु होते. आता पुन्हा त्यांच्या साखरपुड्यावरुन ईशा आणि अरुंधतीमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' ही मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील ईशाचे लग्न हा विषय चर्चेचा विषय ठरत आहे. ईशा आणि अनिशच्या लग्नाला आता अनिरुद्धने होकार दिला आहे. त्यानंतर ईशा खूश झाली आहे. ईशा तिच्या साखरपुड्यासाठी उत्सुक असल्याचे दिसते. मात्र, अरुंधती अगदी घरगुतीपद्धतीने करायचा म्हणते. यावरुन अरुंधती आणि ईशामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते.
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ईशाने तिचा साखरपुडा हा मोठ्या थाटामाटात करायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर कांचनने सध्या अनिरुद्धकडे नोकरी नाही त्यामुळे घरगुती पद्धतीनेच करावा लागणार असे म्हटले. ते ऐकून ईशाला राग येतो. यावर अरुंधती तिला सांगते की, आता मोठा साखरपुडा का करायचा आहे. परिक्षा संपली की तुझ्या मित्रमैत्रीणींना बोलवून मोठं लग्न करु.
वाचा: गौतमी पाटीलला आजवर मिळालेले गिफ्ट पाहिलेत का? पाहा फोटो
ईशा कोणाचंच ऐकून घ्यायला तयार नाही. तिला शो ऑफ करुनच साखरपुडा करायचा हा हट्ट करते. ते ऐकून संजना म्हणते की, 'अनिरुद्ध कर्ज काढूनपण तुझा साखरपुडा करेल पण तुला ते आवडणार आहे का?' ईशा कोणाच ऐकून घ्यायला तयार नाहीये. ती रागाने लाल होते आणि तेथून निघून जाते. आता देशमुख कुटुंबीय थाटामाटात ईशाचा साखरपुडा करणार का? तिचे सर्व हट्ट पुरवणार का? असा प्रश्न पडला आहे. मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
विभाग