Aai Kuthe Kay Karte: लग्न करताना ईशा आणि अनिशची पत्रिका पाहण्यावर मत भेद, मालिकेत रंजन वळण
Aai Kuthe Kaay Karte Update: गेल्या काही दिवसांपासून ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. आता त्यांच्या साखरपुड्याआधी पत्रिका पाहायच्या की नाही यावरुन मतभेद झाल्याचे दिसत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिका एका रंजक वळणावर पोहोचली आहे. मालिकेत ईशाही अनिशसोबत साखरपुडा करण्याचा हट्ट करत आहे. मात्र देशमुख कुटुंबीय तिच्या या निर्णयात तिच्यासोबत नव्हते. विशेष करुन अनिरुद्धने त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. मात्र मुलीच्या प्रेमाखतर तो तयार होतो. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये कांचन आशुतोष आणि अरुंधतीच्या घरी पोहोचल्या आहेत. त्या ईशा आणि अनिशच्या लग्नाविषयी बोलताना दिसत आहेत. दरम्यान लग्न करताना पत्रिका पहायची की नाही? या गोष्टीवर सुलेखाताई आणि कांचन चर्चा करताना दिसत आहेत.
वाचा: अश्विनीच्या नव्या प्रवासाला होणार सुरुवात; श्रेयससह कुटुंबाची मिळणार साथ!
कांचन म्हणतात की, 'मला माहित आजकाल कोणी पत्रिका बघत नाही पण माझा त्यावर विश्वास आहे. यावर हा मुद्दा मुलांच्या विरोधात जायला नको एवढंच मला वाटतं. त्या दोघांनी एकत्र आयुष्य काढायचं ठरवलं आहे. त्यामुळे त्यात जे येईल, ते त्यांनी स्विकारावं. तशी माझ्याकडे अनिशची पत्रिका आहे.' त्यावर सुलेखाताई आशुतोषला पत्रिका घेऊन यायला सांगतात. या चर्चेमध्ये अरुंधती देखील सहभागी होताना दिसते. आता ईशा आणि अनिशची पत्रिका जुळणार का? दोघेही पत्रिका पाहायला तयार होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
विभाग