Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मध्ये कांचनची चूक देशमुख कुटुंबीयांना टाकणार संकटात
Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते या मालिकेत आता नवे वळण आले आहे. कांचन आजीची चूक पडणार महागात.
सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत सध्या सर्व देशमुख कुटुंबीय चिंतेत आहेत. कारण यशचा अपघात झाला आहे. त्याला नुकताच रुग्णालयातून घरी आणण्यात आले. आता मालिकेत नवा ट्वीस्ट आला आहे. कांचन आजीची चूक देशमुख कुटुंबीयांना संकाटात टाकणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी भागात कांचन आजीने यशसाठी स्थळ आणलेलं पाहायला मिळणार आहे. पण त्या मुलीला पाहिल्यानंतर यशला मात्र गौरीची आठवण येते. त्यानंतर यश आजीला म्हणतो की, आजी तू चांगल्या हेतूने माझं लग्न ठरवत असशील तरी हे थांबव. मला आता लग्न करायचं नाही." यश त्या मुलीला देखील सांगतो, 'मला अजून गौरीचा विसर पडलेला नाही. माझ्या मनात आता दुसऱ्या कोणासाठी जागा नाही.'
कांचन आजीचे वागणे पाहून अभी, संजना आणि ईशा मिळून तिला जाब विचारतात. पण आजी थोडा वेगळा विचार करते. तिच्या मते यशने गौरीला विसरावं, यासाठी त्यांचं लग्न होणं गरजेचं आहे.
दरम्यान दुसरीकडे अनिरुद्धने आता आशुतोषच्या ऑफिसमधून काम करायला सुरुवात केली आहे. तसेच अनिरुद्धने आशुतोषची जागादेखील घेतली आहे. तर वीणादेखील अनिरुद्धला पाठिंबा देत आहे. नितीनला मात्र यासर्व गोष्टींची भीती वाटत आहे. वीणाने अनिरुद्धच्या प्रेमात पडू नये, असे त्याला वाटत आहे.
विभाग