Aai Kuthe Kay Karte: स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं; ईशाच्या लग्नावरुन अनिरुद्ध संतापला
Aai Kuthe Kay Karte Update: ईशाच्या लग्नावरुन अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये वाद होणार असल्याचे आगामी भागामध्ये पाहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून 'आई कुठे काय करते' मालिकेत ईशा आणि अनिशच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे. सुरुवातीला ईशाच्या लग्नाला विरोध करणारा अनिरुद्ध आता मुलीच्या प्रेमाखातर तयार झाला आहे. देशमुख कुटुंबीय ईशाच्या साखरपुड्याची तयारी करत आहेत. अशाताच होणारा खर्च पाहाता अनिरुद्ध आणि अरुंधतीमध्ये वाद होताना दिसत आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ईशाला तिचा साखरपुडा थाटामाटात करायाचा असतो. मात्र, अरुंधती तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तरी ईशा ऐकायला तयार नसते.
वाचा: हिंदू दाम्पत्याने मशिदीत बांधली लग्नगाठ; व्हिडीओ शेअर करत एआर रहमाननं केलं कौतुक!
प्रोमोमध्ये अनिशच्या घरचे ईशाला काही महागड्या गोष्टी भेट म्हणून देतात. मात्र, देशमुख कुटुंबीय अनिशला साधा सुती कुर्ता भेट म्हणून देतात. त्यावरु ईशा चिडते. जेव्हा ही गोष्ट अनिरुद्धला कळते तेव्हा तो अरुंधतीला 'स्वत: चैनीत राहाचं आणि मुलीला मन मारायला सांगायचं' असं बोलतो. ते ऐकून अरुंधती आणखी चिडते.
आता आगामी भागात नोकरी नसलेला अनिरुद्ध ईशाच्या लग्नासाठी पैसा कुठून उभा करणार? अरुंधती थाटामाटात लग्न करायला तयार होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. त्या सर्वांची उत्तरे आजच्या भागात मिळणार आहेत.
विभाग