Aai Kuthe Kay Karte: अभीचे सत्य आले समोर, आता अनघा करणार का माफ?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: अभीचे सत्य आले समोर, आता अनघा करणार का माफ?

Aai Kuthe Kay Karte: अभीचे सत्य आले समोर, आता अनघा करणार का माफ?

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 11, 2024 02:07 PM IST

Aai Kuthe Kay Karte 11th March Serial Update: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte Serial Update: कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिकेत सतत काहीना काही घडत असते. गेल्या काही दिवसांपासून तर मालिकेतील प्रत्येक पात्राच्या आयुष्यात चढउतार सुरु आहेत. अरुंधती आणि अनिरुद्धचे आयुष्य जर सुखकर झाले तर मग ती कसली. आता अरुंधतीच्या आयुष्यात नवे वादळ आले आहे. मायाच्या एण्ट्रीने अरुंधतीचे आयुष्य बदलले आहे. माया आशुतोषच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत आता अरुंधतीला देखील चाहूल लागली आहे. तर दुसरीकडे अभी परदेशात जात असल्याचे सांगून भारतातच आहे. हे जेव्हा अनिरुद्धला कळाले तेव्हा त्याला धक्काच बसला आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात अरुंधती आणि आशुतोष एकमेकांना वेळ देत गप्पा मारताना दिसत आहेत. तसेच झालेल्या चुकांची माफी देखील मागत आहेत. या सगळ्यात आशुतोष अरुंधतीपासून खूप मोठी गोष्ट लपवतो आणि ती म्हणजे मायाचे वागणे. माया कॅप्ममध्ये असताना जे वागली त्याबद्दल अरुंधतीला माहिती असते. पण ते एकदाही दाखवत नाही कारण तिचा आशुतोषवर विश्वास आहे. तेवढ्यात अरुंधतीला एक फोन येतो आणि सगळ्या गोष्टी बिघडतात.
वाचा: राखी सावंतने बुरख्याच्या आत बिकिनी घातली अन्...; फराह खानने सांगितला मजेशीर किस्सा

अभी हा कॅनेडला गेलेला असतो. पण तेथील हॉस्पिटलने त्याच्यावर खोटे आरोप आणि गुन्हा दाखल केल्यामुळे तो पळून भारतात येतो. या सगळ्यानंतर अभी घरी येत नाही. तो बाहेरच असतो. भारतातील पोलिस देखील अभीचा शोध घेत असतात. अनिरुद्धला याबाबत कळते तेव्हा तो त्याचा जामिन करतो. तसेच घरी येऊन अनघाची माफी मागतो. अरुंधतीला अभीचा अपघात झाल्याचे कळते. ती पळत अभीकडे जाते. ती अभीला पुन्हा घरी घेऊन येते. अभीला घरी आलेला पाहून अनघाला धक्काच बसतो. अभी अनघाची माफी मागतो. पण आता अनघा त्याला माफ करणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या

दुसरीकडे मनूला देखील ताप आलेला असतो. आशुतोष तिची काळजी घेतो आणि अरुंधतीला देशमुखांच्या घरी जाण्यास सांगतो. माया आणि आशुतोष मनूची काळजी घेतात. दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढत असते. सुलेखा ताई ते पाहातात. त्या आशुतोषला समजावण्याचा प्रयत्न करतात. आता आशुतोष काय करणार हे देखील मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.

Whats_app_banner