Lok Sabha Elections 2024 : 'इंडिया' आघाडीच्या चांगल्या कामगिरीनंतरही ममता बॅनर्जी राहुल गांधींवर भडकल्या, म्हणाल्या....
मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Elections 2024 : 'इंडिया' आघाडीच्या चांगल्या कामगिरीनंतरही ममता बॅनर्जी राहुल गांधींवर भडकल्या, म्हणाल्या....

Lok Sabha Elections 2024 : 'इंडिया' आघाडीच्या चांगल्या कामगिरीनंतरही ममता बॅनर्जी राहुल गांधींवर भडकल्या, म्हणाल्या....

Jun 05, 2024 02:28 PM IST

Mamta Banerjee targeted Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. बंगालमध्ये राहुल गांधी यांनी माझे ऐकले नाही, असे त्या म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

Mamta Banerjee targeted Rahul Gandhi: लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल ४ जून रोजी जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने २९४ जागा जिंकल्या आहेत. त्याच वेळी, इंडिया आघाडीने २३२ जागा जिंकल्या आहेत. या यशानंतर इंडिया आघाडीत चैतन्याचे वातावरण आहे. इंडिया आघाडी सत्ता स्थापन करण्याचा दावा देखील करू शकते. असे असतांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र राहुल गांधींवर टीका केली आहे. बॅनर्जी यांच्या टीकेवरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

Mumbai Water Logging: मान्सून पूर्व पावसातचं मुंबईची तुंबई; गांधी मार्केट, माटुंगा परिसरात गुडघ्याभर पाणी साचलं!

ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल

राहुल गांधींवर हल्लाबोल करताना बॅनर्जी म्हणाल्या, मी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन केले, मी शरद पवारांचे अभिनंदन केले, मी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांचे देखील अभिनंदन केले, मी राहुल गांधींना त्यांच्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, परंतु ते इतके व्यस्त आहेत की त्यांनी मला माझ्या शुभेच्छांचा प्रतिसाद देखील दिला नाही. राहुल गांधी यांनी जरी मला प्रतिसाद दिला नाही तरी माझ्याकडे गमावण्यासारखे फारसे काही नाही. मी त्यांना सांगितले होते की दोन जागा घ्या आणि लढा, नाहीतर त्याही मिळणार नाहीत. आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही, आणि मी खरे ठरले. कॉँग्रेसचा बंगालमध्ये केवळ एका जागेवर विजय झाला आहे.

Lok Sabha Election : चंद्राबाबू नायडू-नितीश कुमार यांचे प्रेशर पॉलिटिक्स!सभापतीपदावर केला दावा; सूत्रांची माहिती

ममता बॅनर्जी यांनी केले अखिलेश यादवचे कौतुक

उत्तर प्रदेशमध्ये इंडिया अलायन्सची कामगिरी अतिशय उत्कृष्ट झाली आहे. याबाबत ममता बॅनर्जी म्हणाल्या 'अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये खूप चांगले काम केले आहे. मी त्याचे अभिनंदनही केले आहे. मला वाटते की विधानसभा निवडणुकांमध्येही ते चांगली कामगिरी करून सत्ता स्थापन करतील.

बंगालमध्ये टीएमसीचे वर्चस्व

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने लोकसभेच्या ४२ पैकी २९ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला येथून केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. तर भाजपला येथून १२ जागा जिंकण्यात यश आले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या