Virat Kohli : विराट कोहलीने अचानक नॉनव्हेज का सोडलं? शाकाहारी बनल्याने त्याच्या खेळात काय बदल झाला? वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : विराट कोहलीने अचानक नॉनव्हेज का सोडलं? शाकाहारी बनल्याने त्याच्या खेळात काय बदल झाला? वाचा

Virat Kohli : विराट कोहलीने अचानक नॉनव्हेज का सोडलं? शाकाहारी बनल्याने त्याच्या खेळात काय बदल झाला? वाचा

Jan 22, 2025 04:16 PM IST

गेल्या काही वर्षांपासून विराट पूर्णपणे शाकाहारी झाला आहे. त्याने २०१३ पासून त्याच्या फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. पण त्यानंतरही तो ग्रील्ड फिशसारखे मांसाहारी पदार्थ खात राहिला.

Virat Kohli : विराट कोहलीने अचानक नॉनव्हेज का सोडलं? शाकाहारी बनल्याने त्याच्या खेळात काय बदल झाला? वाचा
Virat Kohli : विराट कोहलीने अचानक नॉनव्हेज का सोडलं? शाकाहारी बनल्याने त्याच्या खेळात काय बदल झाला? वाचा

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या फलंदाजीसोबत त्याच्या फिटनेसाठीही ओळखला जातो. विशेष म्हणजे विराट पूर्वी त्याच्या फिटनेसकडे तेवढे लक्ष द्यायचा नाही. तो एका पंजाबी कुटुंबात वाढला आहे. अशा स्थितीत तो भरपूर प्रमाणात बटर चिकनसारखे पदार्थ खायचा. 

पण गेल्या काही वर्षांपासून विराट पूर्णपणे शाकाहारी झाला आहे. त्याने २०१३ पासून त्याच्या फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. पण त्यानंतरही तो ग्रील्ड फिशसारखे मांसाहारी पदार्थ खात राहिला. 

पण २०१८ च्या एका घटनेने त्याला त्याच्या खाण्याची पद्धती पूर्णपणे बदलण्यास भाग पाडले.

विराट कोहलीने मांस खाणे का सोडले?

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीला पाठदुखीचा गंभीर त्रास झाला होता. त्याच्या मणक्यातील एक सर्व्हाईकल डिस्क सरकली होती, ज्यामुळे त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीत तीव्र वेदना आणि मुंग्या येत होत्या.  कोहलीने सांगितले होते, की या अशा दुखण्यामुळे त्याला नीट झोप येत नव्हती, त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागली.

तपासाचे निष्कर्ष धक्कादायक होते. कोहलीला कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्याच्या शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होत होते. त्याच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याने हाडे कमकुवत व्हायला सुरुवात झाली होती. त्याला अस्वस्थ वाटत असे. यानंतर विराटला आपल्या आहारात बरेच बदल करणे आवश्यक असल्याचे जाणवले. यामध्ये मांसाहार पूर्णपणे सोडून देणे हादेखील एक उपाय होता.

७ वर्षांपूर्वी शाकाहारी झालो

केविन पीटरसन याला दिलेल्या एका मुलाखतीत कोहलीने २०१८ च्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी शाकाहारी झाल्याचे सांगितले होते. त्याने मांस खाणे सोडून दिले, कारण असे केल्याने त्याच्या रिकव्हरीला गती येईल आणि त्याचे सामान्य आरोग्य सुधारेल. 

यानंतर विराटच्या क्रिकेट सामन्यांदरम्यान कामगिरीमध्ये आणि रिकव्हरीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. यानंतर कोहलीने याचे आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्वोत्तम पर्याय म्हणून वर्णन केले आहे.

शाकाहार स्वीकारल्यानंतर विराटने फिटनेस कसा राखला?

शाकाहारी आहार घेण्याच्या निर्णयानंतर कोहलीच्या फिटनेसवर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट काय खावे आणि किती प्रमाणात खावे याबद्दल तो अधिक जागरूक झाला. जीवनसत्त्वे आणि वनस्पती-आधारित प्रथिने स्त्रोतांचा वापर करून कोहलीने मैदानावर आपली ताकद आणि फिटनेस राखण्यासाठी त्याच्या आहारावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवले आहे.

शाकाहारामुळे विराटच्या खेळात काही फरक पडला का?

पूर्णपणे शाकाहारी झाल्यानंतर विराटच्या कामगिरीत कुठलाही फरक पडला नाही. तो त्याच उत्साहाने मैदानावर कामगिरी करतो. संतुलित शाकाहारी आहार उच्च पातळीच्या ऍथलेटिक कामगिरीला पाठिंबा देऊ शकतो हे त्याने दाखवून दिले होते. तो जगभरातील ॲथलीट आणि फिटनेस उत्साही लोकांना प्रेरणा देत असतो. आज कोहली जगातील सर्वात तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक आहे आणि त्याच्या यशात त्याच्या शाकाहारी आहाराचा मोठा वाटा आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या