गावस्कर-अमरनाथ लवकर बाद झाल्यानंतर अंशुमन गायकवाड यांनी द्विशतक ठोकलं, ६७१ मिनिंट फलंदाजी करत पाकिस्तानला रडवलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  गावस्कर-अमरनाथ लवकर बाद झाल्यानंतर अंशुमन गायकवाड यांनी द्विशतक ठोकलं, ६७१ मिनिंट फलंदाजी करत पाकिस्तानला रडवलं

गावस्कर-अमरनाथ लवकर बाद झाल्यानंतर अंशुमन गायकवाड यांनी द्विशतक ठोकलं, ६७१ मिनिंट फलंदाजी करत पाकिस्तानला रडवलं

Updated Aug 01, 2024 10:57 AM IST

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू अंशुमन गायवाड यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. ते दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. अलीकडेच बीसीसीआयने त्याच्या उपचारासाठी एक कोटी रुपयांची आर्थिक मदतही केली होती. ते टीम इंडियाचे माजी प्रशिक्षकही होते.

Anshuman Gaiwad : अंशुमन गायकवाड यांचं सामना वाचवणारं झुंजार द्विशतक, ६७१ मिनिटं फलंदाजी करून पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं
Anshuman Gaiwad : अंशुमन गायकवाड यांचं सामना वाचवणारं झुंजार द्विशतक, ६७१ मिनिटं फलंदाजी करून पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं

भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू अंशुमन गायकवाड यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक असलेल्या अंशुमन गायकवाड यांना कर्करोगाने ग्रासले होते. ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकही होते.

अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या, त्यापैकीच एक १९८३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेली २०१ धावांची खेळी संस्मरणीय होती.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना पंजाबमधील जालंधर येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या ५ धावांवर संघाने सुनील गावस्कर यांची विकेट गमावली.

पण सुरुवातीच्या यशानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी मोहिंदर अमरनाथ आणि यशपाल शर्मा यांनाही लवकर बाद केले. टीम इंडिया अडचणीत आली होती, पण अंशुमन गायकवाड यांनी क्रीझवर पाय रोवले होते. एका टोकाकडून विकेट पडत राहिल्या, पण अंशुमन यांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर ठाम राहून १७ चौकारांसह २०१ धावा केल्या.

या खेळीत त्यांनी ४३६ चेंडूंचा सामना केला. त्यांनी टीम इंडियासाठी ६७१ मिनिटे फलंदाजी केली. त्यांच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३७४ धावा केल्या. टीम इंडियाला पहिल्या डावात ३७ धावांची आघाडी मिळाली. मात्र, दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ शेवटचा दिवस संपेपर्यंत केवळ १६ धावा करू शकला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अनिर्णित राहिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या