भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याचा आज (२० सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांची दयनीय अवस्था केली.
या सामन्यापूर्वी ज्या खेळाडूचे संघातील स्थान निश्चित नव्हते, त्याने बांगलादेशचे अवस्थ खराब केली आहे. त्या खेळाडूचे नाव आकाशदीप आहे.
आकाशदीपने प्रथम फलंदाजी आणि नंतर अप्रतिम गोलंदाजी करून पाहुण्या संघाची अवस्था खराब केली. हे वृत्त लिहिपर्यंत बांगलादेशने ५ बाद ९० धावा केल्या होत्या. शकिब अल हसन आणि लिटन दास फलंदाजी करत होते.
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपला. यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेश संघाकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही.
प्रथम जसप्रीत बुमराहने अप्रतिम यॉर्कर टाकत शादमान इस्लामला २ धावांवर बाद केले. यानंतर आकाश दीपने उपाहारापूर्वी लागोपाठ दोन चेंडूंत २ बळी घेत बांगलादेशची धावसंख्या २२ धावांत ३ विकेट्सवर नेली.
आकाशदीपने दोन्ही विकेट अगदी अचूक आणि धारदार यॉर्कर्सवर घेतल्या. आकाशदीपची ही गोलंदाजी पाहून त्याचा सहकारी आणि सध्याच्या काळातील यॉर्कर किंग म्हटला जाणारा जसप्रीत बुमराह याने त्याचे कौतुक केलेच असेल.
बंगालकडून देशांतर्गत खेळणाऱ्या बिहारच्या या खेळाडूने दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. त्या आधारावर त्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवआवजी प्राधान्य देण्यात आले. हा शेवटच्या क्षणाचा निर्णय होता.
कुलदीप यादवला हटवून त्याच्या जागी कोणत्याही गोलंदाजाला संधी देणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र, आकाश दीपने आपल्या डावातील दुसऱ्याच षटकात सलग २ बळी घेत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा विश्वास सार्थ ठरविला.
त्याने ९व्या षटकातील पहिला चेंडू मधल्या स्टंपवर मारला. अगदी अचूक आणि चपळ बुद्धी असलेला फलंदाज झाकीर हसन काही समजू शकला नाही. चेंडू स्टंपवर आदळला आणि त्याला ३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. दुसरा चेंडूही असाच होता. चेंडू पॅडवरून उडून स्टंपला लागला. मोमिनुल हकला मैदानात उतरायला आणि परतायला वेळ लागला नाही. त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र, तिसऱ्या चेंडूवर आकाशला विकेट घेता आली नाही आणि हॅटट्रिक हुकली.
आकाश दीपने फलंदाजीतही चमत्कार केला. त्याने ३० चेंडूंचा सामना केला आणि ४ चौकारांच्या जोरावर १७ धावांची खेळी केली. यामुळेच टीम इंडियाने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावून ३७६ धावांची मोठी धावसंख्या उभारली.
संबंधित बातम्या