virat kohli in semi final matches t20 world cup : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा दुसरा सेमी फायनल सामना आज (२७ जून) भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. हा सामना गयाना येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.
दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची बॅट पूर्णपणे शांत आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चिंता भारतीय चाहत्यांना आहे. पण अशाीही परिस्थितीत भारताला विराट कोहलीकडून खूप अपेक्षा असतील.
या T20 विश्वचषकात भलेही कोहली फ्लॉप ठरला असेल, पण आजपर्यंत किंग कोहली T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एकदाही फ्लॉप ठरला नाही.
विराट कोहलीने आतापर्यंत टी-20 विश्वचषकाच्या ३ उपांत्य फेरीत फलंदाजी केली आहे आणि तिन्ही वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वेळी, म्हणजेच २०२२ च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या होत्या.
त्याआधी, २०१६ च्या T20 विश्वचषकात कोहलीने उपांत्य फेरीत ४७ चेंडूत ८९* धावा केल्या होत्या. किंग कोहलीने २०१४ मध्ये पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळली होती, त्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ७२* धावा केल्या होत्या.
७२*(४४ चेंडू) धावा - T20 विश्वचषक उपांत्य फेरी २०१४
८९*(४७ चेंडू) धावा - T20 विश्वचषक उपांत्य फेरी २०१६
५० (४० चेंडू) धावा - T20 विश्वचषक उपांत्य फेरी २०२२.
विराट कोहली २०२४ च्या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत फ्लॉप दिसला आहे. आतापर्यंत त्याने आपल्या बॅटने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेतील ६ डावांमध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये तो दोनदा शुन्यावर बाद झाला. ६ डावांमध्ये, कोहलीने ११ च्या सरासरीने आणि १०० च्या स्ट्राइक रेटने ६६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३७ होती. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत कोहली कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या