Virat Kohli : प्रतीक्षा संपली! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर विराट कोहली फॉर्मात परतला, ४५१ दिवसांनी केलं अर्धशतक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : प्रतीक्षा संपली! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर विराट कोहली फॉर्मात परतला, ४५१ दिवसांनी केलं अर्धशतक

Virat Kohli : प्रतीक्षा संपली! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर विराट कोहली फॉर्मात परतला, ४५१ दिवसांनी केलं अर्धशतक

Published Feb 12, 2025 03:28 PM IST

Virat Kohli India vs England, 3rd ODI : विराट कोहली दुसऱ्याच षटकात क्रीझवर आला. अहमदाबादमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ १ धाव काढून बाद झाला. यानंतर मार्क वुडने विराट कोहलीला सुरुवातीला खूप त्रास दिला. पण कोहलीने संयमाने फलंदाजी केली.

अखेर प्रतीक्षा संपली, विराट कोहली फॉर्मात परतला, ४५१ दिवसांनी घडली मोठी कामगिरी, पाहा
अखेर प्रतीक्षा संपली, विराट कोहली फॉर्मात परतला, ४५१ दिवसांनी घडली मोठी कामगिरी, पाहा (PTI)

अहमदाबाद वनडेत विराट कोहली याने चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपवली आहे. तो फॉर्मात परतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराटने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. विराटने ५५ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. 

५२ धावा हा विराटसाठी मोठा आकडा नाही. पण ज्यावेळी हे अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले त्यामुळे या धावांचे महत्त्व वाढते. विराट कोहलीने अहमदाबादमध्ये ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने अर्धशतक केले. विशेष म्हणजे, विराटने ४५१ दिवसांनंतर एकदिवसीय सामन्यात अर्धशतक केले.

विराट कोहली अर्धशतकानंतर बाद

विराट कोहली दुसऱ्याच षटकात क्रीझवर आला. अहमदाबादमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा केवळ १ धाव काढून बाद झाला. यानंतर मार्क वुडने विराट कोहलीला सुरुवातीला खूप त्रास दिला. पण कोहलीने संयमाने फलंदाजी केली. विराट कोहलीने सेट झाल्यानंतर त्याचे शॉट्स खेळले. त्याने फ्लिकपासून कव्हर ड्राईव्हपर्यंत सर्व शॉट खेळले. 

विराटने शुभमन गिलसोबत ९६ चेंडूत शतकी भागीदारी केली. यासह विराटने ५० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

विराट पुन्हा आदिल रशीदचा बळी ठरला

विराट कोहलीने अर्धशतक झळकावून सेट झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, जेव्हा तो सेट होतो, तेव्हा तो त्याच्या बॅटने मोठी खेळी करतो पण अहमदाबादमध्ये तो चुकला. आदिल रशीदच्या उत्कृष्ट लेगस्पिनमुळे विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

विराट कोहली १० सामन्यांत पाचव्यांदा आदिल रशीदचा बळी ठरला. मात्र, अशा वाईट टप्प्यानंतर विराटने धावा करणे ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता काही दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे.

कोहली गेल्या १० डावांमध्ये अपयशी ठरला होता

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत पन्नासहून अधिक धावांची शेवटची इनिंग खेळली, त्यानंतर पुढच्या १० डावात फ्लॉप झाला. पण अहमदाबादमध्ये त्याने या अपयशाला पूर्णविराम दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही त्याची बॅट अशीच कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या