Vijay Hazare Trophy : शार्दुल ठाकूरच्या संघाने चमत्कार घडवला, ५० षटकांचा सामना केवळ ३३ चेंडूत जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Vijay Hazare Trophy : शार्दुल ठाकूरच्या संघाने चमत्कार घडवला, ५० षटकांचा सामना केवळ ३३ चेंडूत जिंकला

Vijay Hazare Trophy : शार्दुल ठाकूरच्या संघाने चमत्कार घडवला, ५० षटकांचा सामना केवळ ३३ चेंडूत जिंकला

Dec 27, 2024 02:28 PM IST

Arunachal Pradesh vs Mumbai : ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये एक अनोखा नजारा पाहायला मिळाला. यात शार्दुल ठाकूरच्या संघाने अरुणाचल प्रदेशचा अवघ्या ३३ चेंडूंमध्ये पराभव केला.

शार्दुल ठाकूरच्या संघाने चमत्कार घडवला, ५० षटकांचा सामना केवळ ३३ चेंडूत जिंकला
शार्दुल ठाकूरच्या संघाने चमत्कार घडवला, ५० षटकांचा सामना केवळ ३३ चेंडूत जिंकला (PTI)

मुंबई क्रिकेट संघ हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघ आहे. अलीकडेच या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. मुंबई रणजी ट्रॉफीचा गतविजेताही आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र तेव्हापासून हा संघ उत्कृष्ट कामगिरी दाखवत आहे.

तिसऱ्या सामन्यात मुंबईला कमकुवत अरुणाचल प्रदेशचे आव्हान होते. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ मैदानात उतरला होता.

अरुणाचल अवघ्या ७३ धावांत गारद

मुंबईच्या गोलंदाजांनी अरुणाचल प्रदेशला अवघ्या ७३ धावांत गुंडाळले. टॉप-४ मधील तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. सलामीवीर राजेंद्र सिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आलेला बिकी कुमार आणि चौथ्या क्रमांकावर आलेला नबाम टेंपलही शून्यावर बाद झाला.

केवळ सलामीवीर टेची डोरिया (१२) आणि १०व्या क्रमांकावर असलेला यब निया (१७) दुहेरी आकडा गाठू शकला. अरुणाचल प्रदेशचा डाव ३३व्या षटकात ७३ धावांवर गडगडला. 

मुंबईच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर शार्दुल ठाकूर, हर्ष तन्ना, हिमांशू सिंग आणि अथर्व अकोलेकर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

सहाव्या षटकातच विजय मिळविला

 ७४ धावांचा पाठलाग करताना मुंबईने सहाव्या षटकातच हा सामना जिंकला. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशीने संघाला स्फोटक सुरुवात करून दिली. त्याने केवळ १८ चेंडूत अर्धशतक केले. मात्र, दुसऱ्या षटकात आयुष म्हात्रे ११ चेंडूत १५ धावाच करू शकला.

म्हात्रे संघाच्या ६२ धावा झाल्या असताना अभिनव सिंगच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर यष्टीरक्षक हार्दिक तामोरे याने अंगक्रिशसह संघाला विजयापर्यंत नेले. तामोरेने ४ चेंडूत ७ धावा केल्या. या विजयासह मुंबईचा संघ क गटात ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने तीन सामन्यांपैकी २ जिंकले असून एकात पराभव पत्करावा लागला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या