भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्याच्या फिरकी ट्रॅकवर खेळला गेला. किवी संघाने हा सामना ११३ धावांनी जिंकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी एकूण १८ विकेट्स घेतल्या. तर भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.
या सामन्यात एकट्या मिचेल सँटनर याने १३ विकेट घेतल्या. यानंतर भारतीय फलंदाज फिरकी खेळण्यात पटाईत नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
विशेष म्हणजे, भारतीय फलंदाज फिरकीपटूंसमोर अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा असे घडले आहे. अशा परिस्थितीत, आपण येथे कोणता संघ फिरकी गोलंदाजी खेळण्यात सर्वोत्तम आहेत, हे जाणून घेणार आहोत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय क्रिकेट संघ फिरकी खेळण्याच्या बाबतीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या मागे आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांत या देशांनी भारतापेक्षा चांगली फिरकी खेळली आहे. २०२० पासून आशियातील फिरकीपटूंविरुद्ध भारताची सरासरी ३६.९ आहे.
तर पाकिस्तानने फिरकी गोलंदाजीवर ४५.५ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर बांगलादेशची फिरकीविरुद्ध सरासरी ४० आहे. या यादीत श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने फिरकीविरुद्ध ४७.१ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे आकडे २०२० पासून आशियामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांचे आहेत. तसेच, हे आकडे एक ते सातव्या क्रमांकापर्यंतच्या फलंदाजांचे आहेत.
श्रीलंका- ४१.१
पाकिस्तान- ४५.५
बांगलादेश- ४०
भारत- ३६.९
ऑस्ट्रेलिया- ३५.९
इंग्लंड- ३१.५
दक्षिण आफ्रिका- ३१.५
न्यूझीलंड- २९.५
वेस्ट इंडिज- २७.६
संबंधित बातम्या