IND vs PAK T20 World Cup 2024: भारत : टी-20 वर्ल्डकप २०२४ अवघ्या काही दिवसांवर आला आहे. टी-20 वर्ल्डकप २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे खेळला जाणार आहे. तर या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. हा सामना ९ जून रोजी होणार आहे.
पण या सामन्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. आयएसआयएस- खुरासन या दहशतवादी संघटनेने भारत-पाकिस्तान सामन्यावर हल्ला करण्याची उघड धमकी दिली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. मात्र दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने सर्वांचीच चिंता वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या आयएसआयएस- खुरासन ISIS-Khorasan (ISIS-K) या दहशतवादी संघटनेने भारत-पाकिस्तान सामन्यावर हल्ला करण्याची उघड धमकी दिली आहे.
या दहशतवादी संघटनेने स्वतंत्र हल्लेखोरांना हे काम करण्यास सांगणारा व्हिडिओ जारी केला आहे. मात्र, या धमकीच्या व्हिडिओनंतर आयसीसी (ICC) अॅक्शनमध्ये आली असून भारत-पाकिस्तान सामन्यासाठी त्यांनी आपली सुरक्षा वाढवली आहे.
९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अमेरिकेने सुरक्षा वाढवली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, ISIS संघटनेने भारत-पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात, CWI चे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉनी ग्रेव्ह्स म्हणाले की, या सामन्यासाठी पूर्ण काळजी घेतली जात आहे, त्यामुळे या सामना, खेळाडू आणि चाहत्यांना कोणताही धोका नाही. आमची टीम सतत देखरेख करत आहे.
टीम इंडिया आपले बहुतेक सामने न्यूयॉर्कमध्ये खेळणार आहे. च्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारत एक सराव सामना खेळणार आहे. यामध्ये त्यांचा सामना बांगलादेशशी होणार आहे. यानंतर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
संबंधित बातम्या