Pakistan Cricket : पाकिस्तानच्या नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड, चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Pakistan Cricket : पाकिस्तानच्या नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड, चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं

Pakistan Cricket : पाकिस्तानच्या नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड, चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं

Published Feb 27, 2025 06:36 PM IST

Champions Trophy 2025 Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून पाकिस्तानी संघ बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे यजमान असलेल्या पाकिस्तानने या स्पर्धेत एकही सामना जिंकला नाही. एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडणारा पाकिस्तान हा पहिला यजमान देश ठरला आहे.

Pakistan Cricket : पाकिस्तानच्या नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड, चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं
Pakistan Cricket : पाकिस्तानच्या नावावर झाला लाजिरवाणा रेकॉर्ड, चॅम्पियन्स ट्रॉफीत असं कधीच घडलं नव्हतं (AFP)

Pakistan vs Bangladesh : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा यजमान देश पाकिस्तान ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. याहून लाजिरवाणी बाब म्हणजे त्यांचा प्रवास कोणत्याही विजयाशिवाय संपला आहे. आज गुरुवारी (२७ फेब्रुवारी) पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात यजमान देशाला स्पर्धेतील एकही सामना जिंकता आला नाही, असे यापूर्वी घडले आहे का? 

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. ६० धावांनी झालेल्या दारूण पराभवातून पाकिस्तानला कोणताही धडा घेता आला नाही. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने त्यांचा ६ गडी राखून पराभव केला. पाकिस्तान संघ कोणत्याही क्षेत्रात मजबूत आहे असे कधीच वाटले नाही.

त्यांनी दोन्ही सामने वाईटरित्या गमावले. यामुळे यजमान संघ स्पर्धेबाहेर झाला. पण आजचा त्यांचा शेवटचा सामना स्वाभिमानासाठी आणि लज्जास्पद रेकॉर्ड मोडण्यासाठी होता. पण हा सामना रद्द झाला.

चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली आवृत्ती १९९८ मध्ये बांगलादेशमध्ये खेळली गेली. यजमान असूनही बांगलादेश या स्पर्धेत खेळला नाही. कारण तो त्यावेळी कसोटी खेळणारा देश नव्हता.

२००० मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद केनियाकडे होते. यंदाच्या मोसमाचे स्वरूप आतापेक्षा वेगळे होते. भारताने उपांत्यपूर्व फेरीत केनियाचा पराभव केला होता. मुख्य स्पर्धेत केनियाने खेळलेला हा एकमेव सामना होता. पण याआधी केनियाने बाद फेरीचा सामना खेळला होता, ज्यात त्यांनी विजय मिळवला होता.

२००२ पासून आतापर्यंत ६ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. यजमान देशाने एकही सामना जिंकल्याशिवाय स्पर्धा संपवली असे कधीच घडले नाही. २००२  मध्ये श्रीलंका यजमान होता. या आवृत्तीत तो भारतासोबत संयुक्त चॅम्पियन बनला.

२००४ मध्ये इंग्लंड हा यजमान देश होता. इंग्लंडने ग्रुप स्टेजचे दोन्ही सामने जिंकले होते. तो अंतिम फेरीत पोहोचला, जिथे वेस्ट इंडिजने त्यांचा पराभव केला. २००६  मध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान देश होता. या मोसमात भारत ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता पण ३ पैकी १ मॅच जिंकला होता.

त्यानंतर २००९ मध्ये दक्षिण आफ्रिका, २०१३ आणि २०१७ मध्ये इंग्लंड यजमान देश होता. यजमान देशाने एकही सामना जिंकल्याशिवाय स्पर्धेला अलविदा केल्याचे यापूर्वी कधीही घडले नाही.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या