Rohit Sharma : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा ढसाढसा रडला? खरं काय? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rohit Sharma : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा ढसाढसा रडला? खरं काय? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

Rohit Sharma : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा ढसाढसा रडला? खरं काय? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

Published Jun 28, 2024 11:16 AM IST

Rohit Sharma vs England SemiFinal :टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करून टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Rohit Sharma : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा ढसाढसा रडला? खरं काय? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या
Rohit Sharma : टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा ढसाढसा रडला? खरं काय? व्हायरल व्हिडिओचे सत्य जाणून घ्या (Screengrab)

टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप २०२४ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. येथे भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव केला. संघाच्या या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला.

विजयाच्या आनंदात रोहितला अश्रू आवरता आले नाहीत आणि तो रडू लागला, असा दावा केला जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहलीसह इतर सहकारीही दिसत आहेत.

खरंतर व्हायरल झालेला रोहितचा व्हिडिओ ड्रेसिंग रूमच्या बाहेरचा आहे. यामध्ये तो बाहेर खुर्चीवर बसलेला दिसत आहे. भारताच्या विजयानंतर सर्व खेळाडू ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, रोहितला पाहिल्यानंतर कोहलीने त्याचे कौतुक केले. कोहली येण्यापूर्वीच रोहित मान खाली घालून हाताने डोळे पुसताना दिसला. या वेळी इतर खेळाडूही पुढे सरसावले. टीम इंडियाच्या विजयाच्या आनंदात रोहितला अश्रू अनावर झाल्याचा दावा केला जात आहे.

 

रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच पराभव केला. त्याने ३९ चेंडूंचा सामना करत ५७ धावा केल्या. रोहितच्या या खेळीत ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्फोटक खेळी केली होती. या T20 विश्वचषकात रोहितची फलंदाजी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना भारताने १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १०३ धावांवर गडगडला.

आता T20 विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना २९ जूनला खेळवला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बार्बाडोस येथे हा सामना होणार आहे. शनिवारी संध्याकाळी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ भिडतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या