Women's T20 World cup : भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Women's T20 World cup : भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक

Women's T20 World cup : भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक

Published Oct 14, 2024 10:25 PM IST

महिला टी-20 विश्वचषकात आज (१४ ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान आमनेसामने होते. दुबईत झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटका ६ बाद ११० धावा केल्या होत्या.

Women's T20 World cup : भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक
Women's T20 World cup : भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ वर्ल्ड कपमधून बाहेर, न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक (AP)

महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडने पाकिस्तानचा ५४ धावांनी धुव्वा उडवला. पाकिस्तानच्या पराभवामुळे भारतीय संघ विश्वचषकातूनही बाहेर पडला आहे. काल रविवारी (१३ ऑक्टोबर) भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव झाला होता. अशा परिस्थितीत न्यूझीलंड-पाकिस्तान सामन्याच्या निकालावर टीम इंडियाच्या सेमी फायनलचे भवितव्य अवलंबून होते.

वास्तविक, सेमी फायनल गाठण्यासाठी पाकिस्तानला १११ धावांचे लक्ष्य १०.४ षटकात गाठायचे होते. पण जर १०.४ षटकानंतर पाकिस्तानने हे लक्ष्य गाठले असते, तर भारतीय संघ सेमी फायनलमध्ये गेला असता. 

कारण भारताचे नेट रनरेट चांगले होते. पण, न्यूझीलंडने हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली. कारण त्यांचे ४ ६ गुण झाले. पाकिस्तान आणि भारताचे ४ गुण आहेत. 

हा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता आणि दोघांनाही उपांत्य फेरीत स्थान पक्के करण्याची संधी होती. दुबईच्या संथ खेळपट्टीवर प्रथम खेळताना किवी संघाने २० षटकात ६ बाद ११० धावा केल्या. 

ही अगदी छोटी धावसंख्या आहे असे दिसते, पण खेळपट्टीची अवस्था अशी होती की, संपूर्ण पाकिस्तान संघ त्यातून केवळ अर्ध्या धावाच करू शकला. पाकिस्तानी संघ ११.४ षटकात ५६ धावा करून गारद झाला.

पाकिस्तान संघाची अतियश अवस्था वाईट

न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण पाकिस्तान संघाच्या विकेट पडण्याची मालिका दुसऱ्या षटकात सुरू झाली, त्यानंतर २८ धावा होईपर्यंत अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. पण यानंतर एकवेळ संघाने ५ विकेट गमावून ५२ धावा केल्या होत्या.

पण पुढच्या ४ धावांतच पाकिस्तानने उरलेल्या ५ विकेट्सही गमावल्या. टीम इंडिया पाकिस्तानवर विसंबून असताना, त्यांचे ९ फलंदाज धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.

भारताचे स्वप्न भंगले

भारताला आजपर्यंत महिला टी-20 विश्वचषक जिंकता आलेला नाही. आता पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी उंचावण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे.

न्यूझीलंडचा डाव

तत्पूर्वी, या सामन्यात न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने सर्वाधिक २८ धावा केल्या, तर ब्रूक हॅलिडेने २२ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून नशरा संधूने अप्रतिम गोलंदाजी करत चार षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतले.

चांगल्या सुरुवातीनंतर न्यूझीलंडचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावलेल्या न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध ५८ धावांत ३ गडी गमावले. नशरा संधूने पॉवरप्ले संपल्यानंतर सलामीवीर जॉर्जिया प्लिमरला बाद करत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले.

यानंतर नशराने २९ चेंडूत २८ धावा करून बाद झालेल्या बेट्सलाही आपला बळी बनवले. ओमाइमा सोहेलने अमेलिया केरला मोठी खेळी करण्यापासून रोखले आणि फातिमा सनाला झेलबाद केले. १७ चेंडूंत ९ धावा करून अमेलिया केर बाद झाली. यानंतर शेवटी कसेतरी न्यूझीलंडने ११० धावांपर्यंत मजल मारली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या