IND vs AUS : दुबईत टीम इंडियाला पराभूत करणं अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मोठा विक्रम केला, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs AUS : दुबईत टीम इंडियाला पराभूत करणं अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मोठा विक्रम केला, पाहा

IND vs AUS : दुबईत टीम इंडियाला पराभूत करणं अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मोठा विक्रम केला, पाहा

Published Mar 05, 2025 10:22 AM IST

India vs Australia Semi Final : भारतीय संघाने एक मोठा विक्रम केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा हा सलग नववा विजय आहे. त्याचबरोबर भारताचा एक सामना बरोबरीत सुटला आहे. गेल्या १० सामन्यांमध्ये दुबईत भारताने एकही सामना गमावलेला नाही.

IND vs AUS : दुबईत टीम इंडियाला पराभूत करणं अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मोठा विक्रम केला, पाहा
IND vs AUS : दुबईत टीम इंडियाला पराभूत करणं अशक्य! ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने मोठा विक्रम केला, पाहा (PTI)

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ ४९.३  षटकांत सर्वबाद २६४ धावांवर गारद झाला. अशाप्रकारे रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघासमोर २६५ धावांचे लक्ष्य होते. भारताने ४८.१ षटकांत ६ गडी राखून लक्ष्य गाठले.

या विजयानंतर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली आहे. तसेच भारतीय संघाने एक मोठा विक्रम केला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा हा सलग नववा विजय आहे. त्याचबरोबर भारताचा एक सामना बरोबरीत सुटला आहे. मात्र, गेल्या १० सामन्यांमध्ये दुबईत भारताला पराभूत करण्यात विरोधी संघ अपयशी ठरला आहे.

न्यूझीलंडच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद-

तथापि, कोणत्याही मैदानावर सलग सर्वाधिक एकदिवसीय विजय मिळवण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. ड्युनेडिनमध्ये सलग १० वनडे जिंकण्याचा विक्रम न्यूझीलंडने केला आहे. मात्र आता या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल जिंकण्यात यशस्वी ठरल्यास न्यूझीलंडच्या विश्वविक्रमाची बरोबरी करेल.

वास्तविक, आतापर्यंत भारताने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सलग ९ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर या यादीत भारत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सलग ७ एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम भारताने केला आहे. तर हैदराबाद (पाकिस्तान) च्या मैदानावर पाकिस्तानने सलग ७ एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात काय घडलं?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ४९.३ षटकांत सर्वबाद २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ७३ धावा केल्या. तर ॲलेक्स कॅरीने ६१ धावांचे योगदान दिले.

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला. हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी १-१ फलंदाज बाद केले.

यानंतर ऑस्ट्रेलियाच्या २६४ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ४८.१ षटकांत ६ विकेट्स राखून लक्ष्य गाठले. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ८४ धावा केल्या. याशिवाय श्रेयस अय्यरने ४५ धावांचे योगदान दिले. तर केएल राहुल ४२ धावा करून नाबाद परतला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि ॲडम झाम्पाने २-२ बळी घेतले. बेन डॉरिस आणि कूपर कॉनोली यांनी १-१ फलंदाज बाद केले.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या