ज्या खेळाडूने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, त्या खेळाडूने अवघ्या काही महिन्यांत अनुभवी केएल राहुल याला मागे टाकले आहे. केएल राहुल सध्या टीम इंडियाचा टॉप ट्रेंड बॅट्समन आहे. खेळाडूने त्याच्या चांगल्या कामगिरीसाठी ट्रेंड केला पाहिजे असे म्हटले जात असले तरी राहुल त्याच्या खराब खेळासाठी सध्या ट्रेंड करत आहे.
केएल राहुलचे बरेच चाहते आहेत, जे आता हळूहळू त्याच्याकडे पाठ फिरवत आहेत. चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूसोबत चाहतेही राहतात. दरम्यान, सर्फराज खानने आता राहुलला मागे टाकले आहे. आपण येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंबद्दल बोलत आहोत.
सर्फराज खानने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या मोसमात आतापर्यंत फक्त ४ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ३५० धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५८.३३ आहे. तो ७७.७७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत आहे. त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. वास्तविक, सरफराज पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळत आहे, यापूर्वी तो संघातही नव्हता.
आता जर आपण केएल राहुलबद्दल बोललो तर त्याने या WTC मध्ये ६ सामन्यात ३३९ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३७.६६ आणि स्ट्राइक रेट ६७.६६ आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतके आहेत. म्हणजेच, सरफराज अवघ्या काही दिवसांत केएल राहुलपेक्षा खूप पुढे गेला आहे.
तर केएल राहुल काही विशेष करू शकला नाही. आता टीम इंडिया व्यवस्थापन आणि कर्णधार त्याच्यावर काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड कसोटी मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. यादरम्यान, केएल राहुला आणि सरफराज या दोघांपैकी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळण्याची संधी मिळते? हे पाहणे बाकी आहे.
े
संबंधित बातम्या