Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची रिटेन्शन यादी जाहीर, रोहित-हार्दिक नाही तर ‘या’ खेळाडूला मिळाले १८ कोटी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची रिटेन्शन यादी जाहीर, रोहित-हार्दिक नाही तर ‘या’ खेळाडूला मिळाले १८ कोटी

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची रिटेन्शन यादी जाहीर, रोहित-हार्दिक नाही तर ‘या’ खेळाडूला मिळाले १८ कोटी

Published Oct 31, 2024 05:50 PM IST

Mumbai Indians retention list : मुंबई इंडियन्सने त्यांची रिटेन्शन यादी जाहीर केली आहे.

मुंबई इंडियन्सची रिटेन्शन यादी जाहीर, रोहित-हार्दिक नाही तर ‘या’ खेळाडूला मिळाले १८ कोटी
मुंबई इंडियन्सची रिटेन्शन यादी जाहीर, रोहित-हार्दिक नाही तर ‘या’ खेळाडूला मिळाले १८ कोटी

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ साठी आपली रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने ५ खेळाडूंना रिटेन केले आहे. मुंबईने जसप्रीत बुमराह याला पहिल्या क्रमांकावर रिटेन केले आहे. म्हणजेच त्याला आयपीएल २०२५ साठी १८ कोटी रूपये मानधन मिळणार आहे.

IPL २०२४ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची कामगिरी खूपच खराब होती. गेल्या मोसमातही मुंबई इंडियन्सला अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले. मात्र, संघ पुन्हा एकदा नव्या मोसमासाठी सज्ज झाला आहे.

मुंबईने आयपीएल २०२५ साठी रिटेन खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मुंबई इंडियन्स संघाने पुढील हंगामासाठी मेगा प्लेयर्स लिलावापूर्वी कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

मुंबई इंडियन्सने या खेळाडूंना रिटेन केले

मुंबई इंडियन्स संघाने २०२० मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर आगामी हंगामाबाबत त्यांच्या कोचिंग स्टाफमधून प्रत्येकामध्ये अनेक मोठे बदल दिसून आले आहेत. संघाने यावेळी अनेक बड्या खेळाडूंना वगळले आहे.

मेगा प्लेयर लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या नावांची यादी पाहिली तर त्यात त्यांनी ५ खेळाडूंना कायम ठेवले आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांनी एकाही अनकॅप्ड खेळाडूला कायम ठेवलेले नाही.

मुंबई इंडिन्सचा कर्णधार कोण होणार ?

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२५ साठी सर्व मोठ्या खेळाडूंना कायम ठेवले आहे. आता कोणत्या खेळाडूला संघाचे कर्णधारपद दिले जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली २०२४ हे वर्ष मुंबई इंडियन्ससाठी खूप वाईट होते आणि त्यांचा संघ १०व्या म्हणजेच शेवटच्या स्थानावर राहिला.

या मोसमात संघ आपला कर्णधार बदलू शकतो, असे मानले जात आहे. त्याने कोणाला कर्णधार बनवावे हे सांगणे कठीण असले तरी. पण या यादीत टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्या सर्वात आघाडीवर दिसत आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे, हे घडणे फार कठीण आहे.

जसप्रीत बुमराह - १८ कोटी

सूर्यकुमार यादव – १६.३५ कोटी रुपये

हार्दिक पांड्या - १६.३५ कोटी रुपये

रोहित शर्मा- १६.३० कोटी

तिलक वर्मा – ८ कोटी रु

Whats_app_banner

संबंधित बातम्या