IND vs BAN T20 : टीम इंडियात 'गंभीर इफेक्ट', हेड कोचच्या खास खेळाडूंची संघात निवड, ऋतुराज-ईशानला डच्चू
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs BAN T20 : टीम इंडियात 'गंभीर इफेक्ट', हेड कोचच्या खास खेळाडूंची संघात निवड, ऋतुराज-ईशानला डच्चू

IND vs BAN T20 : टीम इंडियात 'गंभीर इफेक्ट', हेड कोचच्या खास खेळाडूंची संघात निवड, ऋतुराज-ईशानला डच्चू

Published Sep 29, 2024 03:32 PM IST

या संघ निवडीवर नजर टाकली तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो, कारण त्यांच्या काही खास खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

Ishan Kishan and Ruturaj Gaikwad were not picked for the T20I series against Bangladesh
Ishan Kishan and Ruturaj Gaikwad were not picked for the T20I series against Bangladesh

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात तीन टी- च्या टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने शनिवारी (२८ सप्टेंबर) रात्री १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.

या संघ निवडीवर नजर टाकली तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो, कारण त्यांच्या काही खास खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

गंभीरने आयपीएलमधील दोन संघांसाठी मेंटर म्हणून काम केले आहे. तो लखनौ सुपर जायंट्ससोबत दोन वर्षे राहिला. यानंतर, तो मागच्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्समध्ये मार्गदर्शक म्हणून परतला आणि संघाला विजेतेपदापर्यंत नेले. या दोन्ही संघातील प्रत्येकी काही खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे, जे अपेक्षित नव्हते.

केकेआरच्या मिस्ट्री स्पिनरचे पुनरागमन

टीममध्ये सर्वात आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे वरुण चक्रवर्ती. T20 विश्वचषक-२०२१ मध्ये संघाचा भाग असलेला वरुण आयपीएलमध्ये कोलकाताकडून खेळत आहे.

गंभीरच्या नेतृत्वाखाली त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमधील दमदार खेळाच्या जोरावरच त्याला टी-20 विश्वचषकात स्थान मिळाले. मात्र, याआधी त्याने श्रीलंका दौऱ्यावर टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वरुणने भारताकडून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ६ सामन्यांमध्ये केवळ २ विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियात समावेश होण्याच्या शर्यतीत तो कुठेही नव्हता, मात्र त्याचे नाव संघात आहे. गंभीर वरुणला खूप सपोर्ट करतो आणि त्याच्यावर विश्वासही ठेवतो. कदाचित यामुळेच वरुण अचानक तीन वर्षांनी टीम इंडियात पुनरागमन करण्यात यशस्वी झाला.

मयंक यादवला संधी मिळाली

गंभीर लखनौचा मेंटर असताना त्याने मयंक यादवला संधी दिली होती. मयंकने आपल्या झंझावाती गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. मोसमाच्या मध्यात त्याला दुखापत झाली होती, पण आता तो बरा झाला आहे. मयंक हा गंभीरचा जवळचा मानला जातो. तसेच, गंभीर वेगवान गोलंदाजांना खूप महत्व देतो. मयंक पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये आला आहे.

बांगलादेशविरुद् भारताचा टी-२० संघ -

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रायन पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरितदीप सिंग, हरितदीप सिंग. राणा, मयंक यादव

Whats_app_banner

संबंधित बातम्या