Indian Cricket Team : जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया किती मजबूत? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी कशी जिंकणार?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Indian Cricket Team : जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया किती मजबूत? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी कशी जिंकणार?

Indian Cricket Team : जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया किती मजबूत? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी कशी जिंकणार?

Updated Feb 16, 2025 12:51 PM IST

Indian Cricket Team In Champions Trophy : भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. यानंतर टीम इंडिया पाकिस्तान आणि न्यूझीलंडला भिडेल.

Indian Cricket Team : जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया किती मजबूत? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी कशी जिंकणार?
Indian Cricket Team : जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडिया किती मजबूत? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी कशी जिंकणार? (PTI)

Indian Cricket Team : अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात जसप्रीत बुमराह याचा समावेश करण्यात आलेला नाही. वास्तविक, जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. आता प्रश्न असा आहे की जसप्रीत बुमराहशिवाय भारतीय संघ तब्बल १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकू शकेल का?

यापूर्वी, भारताने २०२४ च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून जवळपास १३ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. 

मात्र, आता भारतीय संघ बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. यानंतर टीम इंडिया पाकिस्तान आणि न्यूझीलंडला भिडेल.

बुमराहशिवाय टीम इंडिया किती मजबूत?

वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत यात शंका नाही. विशेषत: टीम इंडियाची वनडे वर्ल्ड कप २०२३ पासूनची कामगिरी उत्कृष्ट आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ आपला फॉर्म कायम ठेवू शकेल का, हा मोठा प्रश्न आहे.

जसप्रीत बुमराहशिवाय भारताचे गोलंदाज विरोधी फलंदाजांविरुद्ध कितपत प्रभावी ठरतील? अलीकडेच भारताने ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत जोस बटलर याच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा पराभव केला. या मालिकेत भारतीय फलंदाजांसोबत गोलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी केली होती.

इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने आपली ताकद दाखवली

भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शानदार शतक झळकावले. याशिवाय युवा फलंदाज शुभमन गिलही उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. तर मधल्या फळीत श्रेयस अय्यरने आपले काम चोख बजावले.

त्याचबरोबर या मालिकेतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने पन्नास धावांचा टप्पा पार केला. या सगळ्याशिवाय भारतीय गोलंदाज आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरले. 

विशेषत: भारतीय फिरकीपटूंविरुद्ध इंग्लिश फलंदाजांकडे उत्तर नव्हते. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या भारतीय फिरकी त्रिकुटासमोर इंग्लिश फलंदाज हतबल आणि असहाय दिसत होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या