IND vs ENG 2nd T20 : चेपॉकवर तिलक वर्माची शानदार फलंदाजी, शेवटच्या षटकात विजय खेचून आणला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG 2nd T20 : चेपॉकवर तिलक वर्माची शानदार फलंदाजी, शेवटच्या षटकात विजय खेचून आणला

IND vs ENG 2nd T20 : चेपॉकवर तिलक वर्माची शानदार फलंदाजी, शेवटच्या षटकात विजय खेचून आणला

Jan 25, 2025 10:44 PM IST

India vs England 2nd T20I Chennai : चेन्नई टी-20 मध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला आहे. भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात तिलक वर्माने चमकदार कामगिरी केली.

IND vs ENG 2nd T20 : चेपॉकवर तिलक वर्माची शानदार फलंदाजी,  शेवटच्या षटकात विजय खेचून आणला
IND vs ENG 2nd T20 : चेपॉकवर तिलक वर्माची शानदार फलंदाजी, शेवटच्या षटकात विजय खेचून आणला (AP)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (२५ जानेवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला तिलक वर्मा ठरला. त्याने ७२ धावांची नाबाद खेळी केली.

इंग्लंडच्या १६६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पण तिलकने एक टोक घट्ट धरून ठेवले आणि शेवटी विजय मिळवून दिला.

भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. या विजयासह त्याने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडने भारताला विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने तिलक वर्माच्या खेळीच्या जोरावर विजय मिळवला. भारताने पहिला T20 सामनाही जिंकला होता. आता दुसरा सामनाही जिंकला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. 

टीम इंडियाची खराब सुरुवात 

धावांचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या षटकात पहिली विकेट गमावली. अभिषेक शर्मा ६ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. त्याने ३ चौकार मारले. यानंतर संजू सॅमसनची विकेट पडली. सॅमसन ७ चेंडूत ५ धावा करून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादवलाही विशेष काही करता आले नाही. 

तो १२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर हार्दिक पांड्याची विकेट पडली. पंड्या ७ धावा करून बाद झाला.

इंग्लंडसाठी बटलरने चांगली खेळी खेळली

इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पण जोस बटलरने संघात पुनरागमन केले. इंग्लंडने २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावा केल्या होत्या. बटलरने 30 चेंडूंचा सामना करत ४५ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि २ चौकार मारले. ब्रेडन कार्सने ३१  धावांची खेळी खेळली. जेमी स्मिथने २२ धावांचे योगदान दिले. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला विशेष काही करता आले नाही.

भारताने ७ गोलंदाज वापरले 

टीम इंडियाने इंग्लंडच्या डावात एकूण ७ गोलंदाजांचा वापर केला. वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या